बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती Beed Information In Marathi

By Wiki Mitra

Published On:

Follow Us

Beed Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठवाड्यातील एक जिल्ह्याचे ठिकाण म्हणजे “बीड” या जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत. फार पूर्वीचे “चंपावती नगरी” असलेले आजचे बीड म्हणून प्रचलित आहेत.बीड जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे.

Beed Information In Marathi

बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती Beed Information In Marathi

हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी आहे. जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, उर्दू, तेलुगू या भाषादेखील बोलल्या जातात.बीड जिल्ह्यातील माजलगाव हा एक सधन तालुका आहे.

बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

बीड जिल्ह्याचा इतिहास

जिल्हयाला फार पुरातन असा इतिहास असुन अनेक शासकांचा आणि त्यांच्या साम्राज्याचा फार मोठा वारसा या शहराने पाहिला आहे आणि आजही बराचसा जतन सुध्दा करून ठेवला आहे.

या शहराच्या चैफेर सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन उभारण्यात आलेल्या भक्कम भिंती आजही प्राचीन इतिहासाचे स्मरण करून देतात.

बीड शहर आजही अनेक प्राचीन वास्तु अभिमानाने जतन करून आहे. जसे या शहराचे प्रवेशव्दार ज्याला आपण वेस असे देखील म्हणतो ते या शहरात आपल्याला पहायला मिळते.

बीडचा सुरुवातीचा इतिहास असा आहे की तो चालुक्य आणि यादव हिंदू राजवंशांशी संबंधित होता. 14व्या शतकात तुघलक मुस्लिम राजघराण्याने बीड जिंकले आणि 1947 पर्यंत मुस्लिम राज्याचा एक भाग राहिला. पौराणिक कथेनुसार महाभारत काळात या शहराचे नाव दुर्गावती होते. काही काळानंतर हे नाव बालणी झाले. त्यानंतर विक्रमादित्याची बहीण चंपावती हिने येथे विक्रमादित्यच्या ताब्यात आल्यावर त्याचे नाव चंपावत ठेवले. 1660 मध्ये बांधलेली जामा मशीद ही देखील येथील ऐतिहासिक वास्तू आहे.

बीड हे महाराष्ट्रातील, भारतातील, मध्ययुगीन मूळचे एक ऐतिहासिक शहर आहे. काही इतिहासकारांनी उल्लेख केल्याप्रमाणे ते कधीही महत्त्वाचे स्थान बनले नाही. शासकांनी, जवळजवळ नेहमीच, त्याच्या क्षुल्लक स्थानामुळे त्याकडे दुर्लक्ष केले.

बीड हे नाव मोहम्मद तुगलकाने दिल्याचे सांगितले जाते.

बीड मध्ययुगीन काळातील ऐतिहासीक शहर आहे परंतु याचा प्रारंभिक इतिहास अस्पष्ट आहे. येथे आढळणा.या पुरातत्व वास्तुंवरून इतिहासकारांच्या मते या शहराला यादव शासकांनी वसवले असावे.

बीड जिल्ह्याचे नामकरण

बीड शहराला ‘भीर’ असेही म्हणतात. या शहराचे नाव, ज्याला पूर्वी चंपावतीनगर असे म्हटले जाते, ते बहुधा भिर (पाणी) या पर्शियन शब्दावरून आले आहे. त्याचे अधिकृत नाव बीड आहे, तथापि, भिर आणि बीर देखील अधूनमधून अधिकृत आणि अनधिकृत कागदपत्रांमध्ये दिसतात.

एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका सारख्या काही संदर्भांमध्ये त्याचा उल्लेख भिर आणि बीर असा आहे. बीड शहराचे नाव “चंपावतीनगर” असे 1990 च्या दशकात महाराष्ट्रात शिवसेना सरकार असताना प्रस्तावित करण्यात आले होते, ते त्याचे जुने नावही होते.

बीड जिल्ह्याची भौगोलिक माहिती

बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,693 चौरस किलोमीटर आहे.

बीड जिल्हा समुद्रापासून दूर आहे. बीड जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. जिल्ह्यातील उत्तर भाग सपाट मैदानी आहे. जिल्ह्याच्या मध्य-दक्षिण भागात बालाघाटचे डोंगर आहेत. येथे चिंचोली, नेकनूर हे भाग येतात. या भागास मांजरथडी असेही म्हणतात.

मांजरसुभ्याहून बीडकडे जाताना पालीघाट लागतो. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. या भागास गंगथडी असेही म्हणतात. हा सुपीक भाग गाळापासून बनला आहे. यात गेवराई, माजलगाव व परळी या तालुक्यांचा समावेश होतो.

बीड जिल्ह्याच्या चतुःसीमा

बीड जिल्ह्याच्या पूर्वेला-परभणी,पश्चिमेला अहमदनगर, उत्तरेला -जालना आणि औरंगाबाद आणि दक्षिणेला- लातूर आणि उस्मानाबाद हे जिल्हे आहेत. बीड जिल्ह्याचे विभाजन २ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.

बीड उपविभाग

अंबेजोगाई उपविभाग

या उपविभागांचे विभाजन ११ तालुकामध्ये पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.

बीड जिल्हयातील तालुके

बीड जिल्हयात एकुण 11 तालुके आहेत

बीड, आष्टी, गेवराई अंबेजोगाई, कैज,परळी (वैजनाथ) ,माजलगांव पातोडा,शिरूर (कासार) वाडवणी, धारूर शिरूर व वडवणी या तालुक्यांची निर्मिती २६ जून १९९९ला करण्यात आली.

जिल्ह्यात ६० जिल्हा परिषद मतदारसंघ असून ११ पंचायत समित्या आहेत. एकूण गावे १३४६ तर १०१९ ग्रामपंचायती आहेत. विद्युतीकरण झालेली ग्रामीण गावे : १३७

बीड जिल्ह्याची लोकसंख्या

बीड जिल्ह्याची लोकसंख्या 25,85 ,962 एवढी आहे. साक्षरता प्रमाण 73.50 %इतके आहे. बीड जिल्ह्याचे  लिंग गुणोत्तर प्रमाण 1000 पुरुषांमागे 912 स्त्रिया असे आहे.

बीड जिल्ह्याची वैशिष्ट्ये

बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा सहकारी चळवळींसाठीही ओळखला जातो. महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.

बीड जिल्ह्याची दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात. बीड हे मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. मराठीतील आद्य कवी मुकुंदराज आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात आहे. बीड शहरातून बिंदुसरा नदी वाहते.

मुर्तुजा शाह निजामच्या काळात बांधली गेलेली बीडची खजाना विहीर (खजाना बावड़ी) प्रसिद्ध आहे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. माजलगाव येथें सिंदफणा नदी असून तिच्यावर धरण बांधलेले आहे. गंगामासला येथें मोरेश्वर गणपती मंदिर आहे. तेलगावं येथें सुदेर्रावजी सोळके साखर कारखना आहे. माजलगाव येथें एक फार जुने महादेवाचे मंदिर आहे. बीड हे सिताफळासाठी प्रसीद्ध आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या जिल्ह्यात झाल्याचे सांगितले जाते.

बीड जिल्ह्यात छोटेवाडी नावचे एक छोटे गावं आहे.

बीड जिल्ह्याचे हवामान

जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणत: उष्ण व कोरडे आहे. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मे महिन्यात तापमान खूप असते. डिसेंबर महिन्यात तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील उंचावरील बालाघाट डोंगराळ प्रदेशातील हवामान काहीसे थंड आहे तर सखल भागात ते उबदार व थोडेसे दमट आहे. अंबेजोगाई तालुक्यातील हवामान अधिकच आल्हाददायक असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधील पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून पाऊस अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बराचसा भाग अवर्षणग्रस्त आहे. जो पाऊस पडतो त्याचे जिल्ह्यातील वितरणही असमान आहे.

पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत गेलेले आढळून येते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील अंबेजोगाई, केज, माजलगाव, परळी, धारूर आदी तालुक्यात तो तुलनात्मकदृष्टया अधिक पडतो तर गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर यांसारख्या तालुक्यात तो खूपच कमी पडतो.

जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा, बीड, माजलगाव, केज, आष्टी या तालुक्यांचा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होतो. येथील लोक दुष्काळाचा सामना करतात .

बीड जिल्ह्यातील खनिज संपत्ती

बीड जिल्ह्यात बांधकामासाठी लागणारा दगड सापडतात.

बीड जिल्ह्यातील शेती व पिके

बीड जिल्यात

  • एकूण पिकाखालील क्षेत्र : ६६२ हजार हेक्टर एवढे आहे.
  • एकूण ओलीत क्षेत्र : २३६ हजार हेक्टर इतके आहे.
  • एकूण  वनक्षेत्र : २६ हजार हेक्टर असून ,एकूण पडीत क्षेत्र : १२३ हजार हेक्टर एवढे आहे.
  • एकूण दुसोटा क्षेत्र : हजार हेक्टर

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात. ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे खूप उत्पन्न असलेले प्रमुख पीक असून ते दोन्ही खरीप व रब्बी अशा हंगामांत घेतले जाते.

शिवाय कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, उडीद, तीळ, जवस, मसूर, सोयाबीन, मिरची, ऊस, कांदा, वगैरे अन्य पिकेही जिल्ह्यात घेतली जातात.. बीड जिल्हा हा तेलबिया व भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यातील पाटोदा, बीड, माजलगाव, अंबेजोगाई, केज, शिरूर, आष्टी या तालुक्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते.

बाजरीची शेती प्रामुख्याने पाटोदा, शिरूर, आष्टी, माजलगाव, केज या तालुक्यात केली जाते. भुईमुगाचे उत्पादन प्रामुख्याने आष्टी, अंबेजोगाई, केज येथे होते. कापूस उत्पादनात आष्टी, माजलगाव, बीड व गेवराई तालुके अग्रेसर आहेत.

आष्टी, केज, माजलगाव, बीड, गेवराई व वडवणी या तालुक्यात ऱब्बी ज्वारी होते. आष्टी, केज, माजलगाव, बीड, गेवराई या तालुक्यात गहू पिकतो. आष्टी, पाटोदा, बीड व केज येथे हरभऱ्याचे उत्पादन निघते. करडईची लागवड आष्टी, माजलगाव, गेवराई इत्यादी तालुक्यामध्ये केली जाते.

जिल्ह्यात बागायती शेतीसुद्धा थोड्या प्रमाणात होते. उसाची लागवड आष्टी, बीड, माजलगाव, गेवराई, अंबेजोगाई इत्यादी तालुक्यामध्ये केली जाते. बीड, अंबेजोगाई या तालुक्यांत द्राक्षाचे उत्पादन होते.

गोदावरी व मांजरा या नदयाकाठी कलिंगडाचे उत्पन्‍न घेतले जाते. आंबे उत्पादनात आष्टी, बीड, अंबेजोगाई, नेकनूर आघाडीवर आहेत. नेकनूर येथे काला पहाड व अंबेजोगाई येथे पेवंदी हे आंबे प्रसिद्ध आहेत. याशिवाय पेरू, मोसंबी, केळी यांचेही उत्पन्‍न घेतले जाते.

बीड जिल्ह्यातील नद्या

बीड जिल्ह्यात गोदावरी ,मांजरा ,कुंडलीका, वान,सिंधफणा, गुणवती ,बिंदुसरा, सरस्वती या नद्या वाहतात. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद-बीड, जालना-बीड व परभणी-बीड अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत.

गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. ती जिल्ह्याच्या गेवराई, माजलगाव व परळी तालुक्यांतून वाहत जाते. जिल्ह्यातील सिंधफणा, वाण, सरस्वती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. रेना नदी, वाण नदी व सरस्वती नदी या बीड जिल्ह्यातील मध्य डोंगराळ भागात उगम पावतात व दक्षिणकडे वाहत जाऊन पुढे गोदावरीस मिळतात.

मांजरा ही बीड जिल्ह्यातील दुसरी महत्त्वाची नदी आहे. ही नदी पाटोदा तालुक्यातील हरिश्चंद्र बालाघाटच्या पर्वतरांगामध्ये उगम पावते. ही नदी सुरुवातीस उत्तर – दक्षिण असा प्रवास करून नंतर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेश  करते.

जलसिंचन

बीड जिल्ह्यात विहिरी, कूपनलिका व नद्या ही पाणीपुरवठ्याची मुख्य साधने आहेत. जिल्ह्यात बीड व आष्टी या भागात विहिरी तुलनात्मकदृष्टया अधिक आहेत. बीड शहरात माजलगाव तलाव व बिंदुसरा तलावातून पाणी पुरवठा होतो. बीड शहराला ऐतिहासिक पाणीपुरवठा करमारी खजाना विहिरीद्वारे होत असे.

महत्त्वाचे उद्योग

बीड जिल्ह्यात साखर व उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. जिल्ह्यात १२६ कारखाने आहेत. जिल्ह्यात ७ साखर कारखाने आहेत. जिल्ह्यात ६ सुतगिरण्या आहेत. महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र परळी येथे आहे.

बीड जिल्हा पर्यटन स्थळे

खंडोबा मंदिर

हेमाडपंती स्थापत्यशास्त्रात अंगभूत असलेले खंडोबा मंदिर हे बीडमधील सर्वात जास्त भेट दिलेल्या प्राचीन स्थळांपैकी एक आहे. पूर्वेकडील टेकड्यांवर स्थित, हे महादाजी सिंधिया यांनी १८ व्या शतकात बांधले होते.

बिंदुसरा नदीचा किनारा

बीडच्या हद्दीतील बिंदुसरा नदीचे अस्तित्व हे अनेक निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी शनिवार व रविवारचे ठिकाण बनते. ही गोदावरी नदीची उपनदी असून तिचा उगम बालाघाट पर्वतरांगात होतो.

कंकालेश्वर मंदिर

कंकालेश्वर मंदिर हे बीड जिल्ह्यातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे आणि दरवर्षी शेकडो पर्यटक या मंदिराला भेट देतात. हे भगवान शिवाला समर्पित आहे, आणि म्हणूनच ते हिंदूंमध्ये, विशेषत: शैवांमध्ये एक अत्यंत आदरणीय स्थान मानले जाते.

जामा मशीद

बीड हे भूतकाळात बहुतांश मुस्लिम शासकांच्या ताब्यात असल्याने आज अनेक मशिदी आणि इतर धार्मिक स्थळे आहेत. मुघल राजवटीच्या काळात बांधलेली जामा मशीद ही शहरातील आणि आजूबाजूच्या या प्रमुख मशिदींपैकी एक आहे. हे १७ व्या शतकाच्या सुरुवातीस मुघल राजा जहांगीरने बांधले होते, आणि तेव्हापासून बीडमध्ये त्याचे महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ आहे.

हजरत शहंशाह वली दरगाह

श्री.वैजनाथ मंदिर परळी

प्रथम कवी श्री.मुकुंदराज, अंबाजोगाई

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Wiki Mitra

Leave a Comment