If Sun Doesnt Sets… Essay In Marathi सूर्य ……ज्याच्या एकाकी ज्ञान किरणाने आपल्या दिवसाची सुरुवात होते. आपण कितीही गाढ झोपेत असलो तरी सुद्धा सूर्याचे किरण डोळ्यावर पडतात आपण उठतो, आपल्या कामाला सुरुवात करतो घराबाहेर पडतो पण कधी असा विचार केला आहे का? आपल्याला सकाळी झोपेतून उठवणारा असा सूर्य आपला मित्र, सखा ,सोबती, उगवलाच नाही तर….?
सूर्य मावळला नाही तर…मराठी निबंध If Sun Doesnt Sets… Essay In Marathi
मनात अचानक विचार आला किती छान होईल ना सूर्यच उगवला नाही तर, माझी साखर झोप मोडायला कोणी नसेल दुपारी भयंकर उष्णता नसेल पण खरंच हे चांगलं असेल का? खरच सुर्याविना आपण जगू शकणार का याची कल्पना सुद्धा अशक्य आहे सूर्यामुळे आपल्याला सकाळ झालेली कळते. अंधार दूर होतो सूर्य नाहीतर दिवसच नाही कोणालाही कोणते काम करायला उत्साह वाटणार नाही कोणी कामावर जाणार नाहीत.
लहान मुलं शाळेत जाणार नाही., खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार नाही, झाडावरील पक्षी अंधारामुळे उडू शकणार नाहीत रोजच्यासारखा कोंबडा आरवला नार नाही सगळीकडे अंधारच अंधार राहील सगळीकडे चैतन्य जणू हरवून जाईल, पृथ्वीवरील दिवस आणि रात्र होतात आणि सर्जन सूर्यप्रकाश घेऊन उगवतो आणि अंधाराची साथ घेऊन तो मावळतो परत दुसऱ्या दिवशी नवीन प्रेरणा नव्हती घेऊन उगवतात अशा सूर्याचे आपल्याला रोज गरज आहे झाडे वाळून जातील शेतात काही पिकणार नाही ,पाऊस पडणार नाही, उष्णता नाहीशी होईल.
आपल्या पृथ्वीवर सूर्य हा एकमेव नैसर्गिक ऊर्जा आणि उष्णतेचा स्त्रोत आहे. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अमर्यादित आहे उर्जेचा वापर करून आपण करू शकतो. मानव जातीच्या अस्तित्वासाठी सूर्य खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. सूर्य हा फक्त पृथ्वीवरील अस नव्हे तर आकाशगंगेतील ऊर्जेचा एकमेव स्तोत्र आहे ते पण जर एखाद्या वेळी सूर्य मावळला नाही तर ऐकायला थोडे विचित्र वाटते ना पण खरंच जर असेल झाले तर.
सूर्य मावळला नाही तर सगळीकडे प्रकाश पसरलेला राहील ज्यामुळे रात्री लागणारी विजेचा वापर कमी होऊन विजेची बचत होईल या शिवाय सौर ऊर्जेचा वापर कमीत कमी मी कुठून ऊर्जा उपलब्ध होईल.
ह्या तर होत्या काही चांगल्या गोष्टी पण जर सूर्यास्त झाला नाही .नाहीतर मी उजेड आणि दिवस राहील ज्यामुळे लोकांना आराम करता येणार नाही दिवस आहे म्हणून सर्व बाजार चालूच राहतील .ज्यामुळे त्यांचे शरीर इतके कमजोरी वाढायला लागेल. रात्रीचा चंद्र आणि तारे पाहण्याचा आनंद अनुभव येणार नाही.
सूर्यापासून आपल्याला मोफत ऊर्जा मिळते हे खरे आहे परंतु जर सूर्य 24तास आकाशात राहील त्याच्या उष्णतेने पृथ्वीवरील तापमान वाढायला लागेल .पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊ लागेल .त्यामुळे पृथ्वीवरील जल स्तोत्र कोरडे पडतील. आणि संक्षेपण प्रक्रिया न झाल्याने पाऊस देखील पडणार नाही परिणामी मनुष्य व प्राण्यांना प्यायला पाणी उडणार नाही वातावरणात आद्रतेचे प्रमाण वाढायला लागेल .आकाशातील वातावरण जास्तीत जास्त दाट होऊ लागेल त्यामुळे आकाशात उडणारे विमान वाहतूक बंद करावे लागेल.
सूर्य न मावळल्याने पृथ्वीवरील तापमान वाढ मुळे झाडेझुडपे नष्ट होऊ लागतील. शेती करणे कठीण होईल परिणामी मनुष्य व प्राण्यांना खाण्यासाठी अन्न उरणार सूर्याच्या उष्णतेमुळे पर्वतांवरील बर्फ वितळू लागेल .या बर्फाचे पाणी मनुष्यवस्तीत शिरेल ज्यामुळे महापूर येण्याचा देखील धोका आहे.
सूर्य पृथ्वीला ऊर्जा देतो उजाडतो सूर्याची देव म्हणून पूजा केली जाते सूर्यामुळे आपण दिवस सांगत होतो
थोडक्यात सांगायचे झाले तर सूर्य ना मावळल्याने सृष्टीचे चक्र बिघडून जाईल मनुष्यजीवन आज जसे आहे त्या पद्धतीने अस्तित्वात राहणार नाही परंतु आपल्याला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही कारण आपली दिनचर्या चुकवायला सूर्य काय मनुष्य नाही त्याचे अस्तित्व मनुष्य जन्माच्या हजारो वर्ष आधी होते आणि मनुष्य जीवन नष्ट झाल्यावर ही राहील.