मुंबई शहराबद्दल माहिती Information About Mumbai In Marathi

Information About Mumbai In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा अशा शहराची माहिती पाहणार आहोत .जे स्वप्नांचे शहर म्हणून ओळखले जाते व असेही म्हणतात की ते शहर कधीही न झोपणारे शहर आहे! ते शहर म्हणजे मुंबई !मुंबई भारतातील सर्वाधिक लोकप्रिय शहरांपैकी एक शहर आहे.

Information About Mumbai In Marathi

मुंबई शहराबद्दल माहिती Information About Mumbai In Marathi

भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीकोनातुन सर्वात मोठे शहर मुंबई!

विशाल सागरी किनारा लाभलेले आणि सागरावर वसलेले शहर मुंबई, आयलंड सिटी आणि दक्षिण मुंबई या नावाने देखील हे शहर ओळखले जाते….. भारताची आर्थिक राजधानी अशी या शहराची आणखीन एक ओळख.

मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईमध्ये गरीब ते श्रीमंत या मधील सर्व वर्ग दिसून येतात. सध्याच्या जागतिकीकरणात मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर बनले आहे. मुंबईची स्थापना करणाऱ्या मूळ कोळ जमातीच्या लोकांचे येथे वास्तव्य होते. आजही मुंबई शहरात कोळी जमातीच्या लोकांचे वास्तव्य दिसून येते.

मुंबई, पूर्वी बॉम्बे म्हणून ओळखली जाणारी, भारताच्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. 2018 मध्ये, हे भारतातील दुसरे सर्वात मोठे शहर आणि दिल्लीनंतर जनगणनेच्या दृष्टीने जगातील सातवे मोठे शहर होते.

2011 च्या भारताच्या जनगणनेनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासित क्षेत्रात 1.25 कोटी लोक आणि मुंबई महानगर क्षेत्रात 23 दशलक्ष लोक होते. मुंबई हे भारताचे सर्वात मोठे आर्थिक आणि व्यावसायिक केंद्र आहे, जे भारताच्या जीडीपीच्या 5% आहे. भारताच्या औद्योगिक उत्पादनाच्या 25%, शिपिंग व्यापाराचा 40% आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा भांडवली व्यवहार यात आहे.

नामकरण

मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. [ संदर्भ हवा ] पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले. मुंबई, बम्बई आणि बॉम्बे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला मुंबापुरी म्हणतात. १९९५ मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले.

स्थापना

१८ व्या शतकाच्या मध्य काळात ब्रिटिशांनी कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली. १९ व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले.

१९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई शहर हे या नवीन महाराष्ट्र राज्याची राजधानी बनले. १९९५ मध्ये शिवसेनेची-भाजप युतीचे सरकार सत्तेत असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बाँम्बे पासून मुंबई करण्यात आलं.

मुंबईचा इतिहास

ऐतिहासिकदृष्ट्या देखील भारतातील मुंबई शहर अत्यंत महत्वाचे मानले जाते. बेटांच्या शहरासह, मुंबई 1348 एडीपर्यंत हिंदू सम्राटाच्या अखत्यारीत राहिली. त्यानंतर पोर्तुगीजांनी 1534 पर्यंत राज्य केले. त्यानंतर 1625 पर्यंत डचांनी मुंबईवर राज्य केले. त्यानंतर पुन्हा पोर्तुगीजांनी ते काबीज केले आणि ते 1661 एडी मध्ये चार्ल्स II ला भेट देण्यात आले. पुढे, मुंबईला ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश शासकांनी दरवर्षी 10 पौंड भाड्याने दिले.

ईस्ट इंडिया कंपनीने आपली कापड गिरणी मुंबईत हलवली. अशा प्रकारे शहर झपाट्याने वाढले आणि आपल्या देशाचे प्रमुख व्यावसायिक केंद्र बनले. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश सरकारने ते आपल्या ताब्यात घेतले.

हळूहळू मुंबईची सात बेटे एकामध्ये विलीन झाली. जसे आपल्याला माहित आहे की पूर्वी येथे कोळी आणि मच्छीमारांचे निवासस्थान होते. त्याच्या आराध्य देवी मुंबाच्या नावावरून या जागेला नाव देण्यात आले. पण ब्रिटिशांनी त्याला मुंबा ऐवजी बॉम्बे म्हणू लागले. कारण त्याला मुंबा ऐवजी मुंबई म्हणणे सोयीस्कर वाटले.

1947 मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही मुंबई राज्याच्या अंतर्गत आले.परंतु 60 च्या दशकात भाषेच्या आधारावर राज्याची मागणी निर्माण झाली. अशा प्रकारे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन नवीन राज्यांच्या निर्मितीला मुंबईचे विभाजन करून मंजुरी देण्यात आली. पण बॉम्बेवर वाद निर्माण झाला. मराठी लोक म्हणाले की, मराठी भाषिकांची संख्या मुंबईत जास्त आहे.

म्हणूनच मुंबई महाराष्ट्राच्या अखत्यारीत असावी. दुसरीकडे, गुजरातच्या लोकांनी असा युक्तिवाद केला की बॉम्बेच्या निर्मितीमध्ये गुजरातच्या लोकांचा मोठा हात आहे. या कारणास्तव ते गुजरात राज्याचा एक भाग बनले पाहिजे. असे म्हटले जाते की तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुंबईला दिल्लीप्रमाणे केंद्रशासित प्रदेश बनवायचे होते.

पण मराठी भाषिक क्षेत्र असल्याने, शेवटी ते महाराष्ट्राचा भाग बनले.अशा प्रकारे 01 मे 1960 रोजी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी बनवण्यात आले. मात्र, 26 जानेवारी 1986 रोजी त्याचे नाव मुंबईहून बदलून मुंबई करण्यात आले. अशा प्रकारे हे शहर पुन्हा जुनी मुंबई म्हणून ओळखले जाऊ लागले.

भूवर्णन

पश्चिमेस अरबी समुद्राच्या पूर्वेस ठाणे खाडी व उत्तरेस वसई खाडीच्या मध्यभागी साल्सेट बेटाच्या नैऋत्येकडे अरुंद द्वीपकल्प आहे.मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौ.किमी (२३३ चौरस मैल) आहे. त्यापैकी, बेट शहर. ६७.७९ चौ. किमी (२६ चौरस मैल) पर्यंत पसरलेले आहे, तर उपनगरी जिल्हा  ३७० किमी (१४३ चौरस मैल) पर्यंत पसरला आहे.

मुंबई पश्चिम किनारपट्टीत (कोकण विभाग) उल्हास नदीच्या मुखावर असलेल्या साल्सेट बेटांवर (साष्टी) वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा समुद्रसपाटीपासून ४५० मीटर (१,४५० फूट) उंचीवर आहे.

मुंबईचे दोन वेगवेगळे भाग आहेत – मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा. मुंबई जिल्ह्याला “आयलंड सिटी” किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत – भातसा, तानसा, तुळशी, विहार, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा व मोडकसागर. विहार व पवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर तुळशी तलाव बोरीवली उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या – दहिसर, पोयसर व ओशिवरा (ऊर्फ वालभट) या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात व मिठी नदी तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेला उल्हास नदी आहे. उल्हास नदी कर्जतच्या डोंगरात उगम पावते आणि वसईजवळ समुद्राला मिळते. मिठी नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते.

आपल्याला माहित आहे की मुंबईची गणना जगातील प्रमुख शहरांमध्ये केली जाते. हे समुद्रकिनारी शहर जगातील सर्वात सुंदर बंदरांपैकी एक आहे.

हे शहर कुलाबा, माहीम, छोटा-कुलाबा, माझ-गाव, वरळी, माटुंगा आणि परळ सारख्या छोट्या बेटांवर वसलेले आहे. काळाच्या ओघात, नैसर्गिक बदल आणि मानवी प्रयत्नांमुळे सात बेटे एकत्र मिसळली. अशा प्रकारे या प्रदेशाचे रूपांतर एका महानगरात झाले.

हवामान

मुंबईला उष्णकटिबंधीय हवामान आहे, विशेषतः उष्णदेशीय ओले आणि कोरडे हवामान वर्गीकरण अंतर्गत. ऑक्टोबर ते मे पर्यंतच्या कोरड्या कालावधीत आणि जूनमध्ये ओल्या कालावधीत पीक घेण्याचा फरक असतो.

मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात (मार्च ते ऑक्टोबर) तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मान्सूनचा पाऊस मुंबईत जून ते ऑक्टोबरपर्यंत पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२०० मि.मी. (८५ इंच) आहे. विक्रमी वार्षिक पर्जन्यमान १९५४ साली ३,४५२ मि.मी. इतके झाले होते, तर एका दिवसात सर्वांत जास्त पाऊस जुलै २६, २००५ रोजी ९४४ मि.मी. (३७.१६ इंच) इतका पडला होता.

नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतूत मध्यम सापेक्ष आर्द्रता व मध्यम तापमान असते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे या बदलाकरता कारणीभूत असतात. वार्षिक तापमान कमाल ४०° से. ते किमान १०° से. इतके असते. विक्रमी वार्षिक तापमान कमाल ४३°से. व किमान ७°से असे नोंदवले गेले आहे.

लोकसंख्या

भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठे म्हणुन या शहराकडे पाहिले जाते या शहराची अंदाजे लोकसंख्या 3 कोटी 29 लाख ऐवढी आहे.

मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख असून लोकसंख्या घनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; स्त्रियांचे प्रमाण कमीअसण्याचे कारण, रोजगाराकरिता इतर गावांहून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर हे आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६ % आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे नागरी सोयी सुविधांवर ताण पडतो.

२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईची धार्मिक लोकसंख्येत हिंदू (६६ %), मुस्लिम (२०.६५ %), बौद्ध (४.८५ %), जैन (४.१० %), ख्रिश्चन (३.२७ %),शीख (०.५८ %) आणि बाकी पारशी, यहूदी व निधर्मी (तिन्ही मिळून ०.५७ %) आहेत.भाषावार जनसंख्येत मराठी लोक ४२ %, हिंदी व गुजराती लोक १९ % आणि उर्वरित अन्यभाषी लोक आहेत.

मुंबईतील सर्वात जुने मुस्लिम समुदायांमध्ये दाऊदी बोहरा, इस्माईल खोजा आणि कोकणी मुसलमानांचा समावेश आहे.

ज्यावेळेस मुंबईचा विस्तार व्हायचा होता त्यापुर्वीपासुन कोळी लोक या ठिकाणी समुद्र किना.यावर वास्तव्यास आहेत, त्यांचा उदरनिर्वाह हा संपुर्णतः सागरावर अवलंबुन आहे,समुद्रातले मासे पकडायचे आणि ते ताजे असतांनाच विकायचे असा त्यांचा व्यवसाय आज मुंबईत या कोळी लोकांचे अनेक कोळीवाडे अस्तित्वात आहेत. मांडवी, धारावी, शिवडी, वेसावे, वडाळा, कुलाबा, माहीम, शींव, वरळी, खार, गोराई, चिंबई, मालाड, मढ येथे या कोळयांचे कोळीवाडे आहेत.

नौकरी आणि उद्योगाच्या अनेक संधी येथे उपलब्ध असल्याने देशाच्या कानाकोप.यातुन लोक मोठया प्रमाणात या शहरात येत असतात.

भाषा

मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा , महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असून कोकणी, कोळी,हिंदी, इंग्रजी या भाषादेखील बोलल्या जातात.

मुंबईत एक खास मराठी बोली बोलली जाते. मूळ मराठी कोळी आगरी, भंडारी यांची वेगवेगळी बोलीभाषा आहे.

उद्योगधंदे

मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.

महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांच्या मुख्य कचेऱ्या मुंबईत आहेत.

१९८० पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता अभियांत्रिकी, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात.

मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत.

तसेच मुंबईचे डबेवाले हे खूप प्रसिद्ध आहेत या व्यवसायावर बर्‍याच जणांचे कुटुंब उदरनिर्वाह करतात.

मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे

गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज, छ. शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई मनपा इमारत, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ राजाबाई टॉवर, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँक नाणी नोटा संग्रहालय, एशियाटीक सोसायटी लायब्ररी, डेव्हिड ससून लायब्ररी, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी अॉफ मॉडर्न आर्ट्स, फ्लोरा फाऊंटन (हुतात्मा चौक), वेलिंग्टन फाऊंटन, ओव्हल मैदान, आझाद मैदान, बलार्ड ईस्टेट, क्रॉफर्ड मार्केट, फॅशन स्ट्रीट, St. थॉमस कॅथेड्रल, कॅथेड्रल अॉफ होली नेम, Knesset Eliymoo सिनेगॉग, हर्निमन सर्कल गार्डन.

वाहतूक

जलमार्गाने वा वायुमार्गाने येणारे युरोप, अमेरिका, अफ्रीका अश्या पश्चिमी देशातले नागरिक आधी मुंबईला येतात आणि त्यामुळे या शहराला भारताचे प्रवेशव्दार देखील म्हंटले जाते.

मुंबई रेल्वे मार्गाने, विमान मार्गाने, जहाज मार्गाने आणि रस्त्याने देखील दुरदुर पर्यंत जोडल्या गेले असल्याने वाहतुकीचे सर्व मार्ग खुले आहेत

छत्रपती शिवाजी टर्मिनस (रेल्वे स्थानक), E.S.T. (बस सेवा), छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानसेवा, या नावाने ओळखल्या जातात

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वात व्यस्त विमानतळ म्हणुन ओळखलं जातं, वर्षाला अंदाजे 4 कोटी प्रवासी या विमानतळावर प्रवास करतात.

मुंबईची काही खास वैशिष्ट्ये

2011 च्या भारताच्या जनगणनेनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासित क्षेत्रात 1.25 कोटी लोक आणि मुंबई महानगर क्षेत्रात 23 दशलक्ष लोक होते. मुंबई हे भारताचे सर्वात मोठे आर्थिक आणि व्यावसायिक केंद्र आहे, जे भारताच्या जीडीपीच्या 5% आहे. भारताच्या औद्योगिक उत्पादनाच्या 25%, शिपिंग व्यापाराचा 40% आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा भांडवली व्यवहार यात आहे.

आपल्याला माहित आहे की मुंबईची गणना जगातील प्रमुख शहरांमध्ये केली जाते. हे समुद्रकिनारी शहर जगातील सर्वात सुंदर बंदरांपैकी एक आहे. हे शहर कुलाबा, माहीम, छोटा-कुलाबा, माझ-गाव, वरळी, माटुंगा आणि परळ सारख्या छोट्या बेटांवर वसलेले आहे. काळाच्या ओघात, नैसर्गिक बदल आणि मानवी प्रयत्नांमुळे सात बेटे एकत्र मिसळली. अशा प्रकारे या प्रदेशाचे रूपांतर एका महानगरात झाले.

असे म्हटले जाते की मुंबईचे एक वेगळे जग आहे ज्याला चित्रपट जग म्हणतात. मुंबईचे हॉलिवूड युरोपियन देशाच्या बॉलिवूडपेक्षा कमी नाही. बॉलिवूडपेक्षा मुंबईचे हॉलिवूड जास्त चित्रपट तयार करते.

लीवूडचे चित्रपट भारतातील सर्व सिनेमागृहांच्या तसेच परदेशी सिनेमागृहांच्या पडद्यावर दाखवले जातात. मुंबईत असलेल्या सिने स्टारच्या घराचे दर्शनही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.

भारतातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबईची गणना जगातील पाच प्रमुख शहरांमध्ये केली जाते. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले मुंबई हे सर्वात व्यस्त बंदर मानले जाते.

मुंबईत एका बाजूला अफाट खोली असलेला अफाट महासागर आहे आणि दुसऱ्या बाजूला आकाशाला स्पर्श करणाऱ्या प्रचंड आलिशान इमारती आहेत.

धन्यवाद!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

1 thought on “मुंबई शहराबद्दल माहिती Information About Mumbai In Marathi”

Leave a Comment