ओडिसा राज्याची संपूर्ण माहिती Odisha Information In Marathi

Odisha Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आज आपण ओडिसा या राज्याची माहिती पाहणार आहोत.: ओरिसा भारत देशाच्या २९ राज्यांपैकी एक राज्य आहे. ओड़िशा भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या उत्तरेला आहे.

Odisha Information In Marathi

ओडिसा राज्याची संपूर्ण माहिती Odisha Information In Marathi

भुवनेश्वर ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. भुवनेश्वर आणि कटक ही जुळी शहरे आहेत. क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे.

ओरिसाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

ओड़िशाची विविध नावे : उच्छल (बंगाली), उत्कल, उड्र देश, ओड्र, उडीशा, उडीसा, उड़़ीसा, ओडिसा, ओड़िशा, ओडिशा, ओढिया, ओदिशा, Odisha, Orissa.

ओडिशाच्या उत्तरेला झारखंड , ईशान्येला पश्चिम बंगाल , दक्षिणेला आंध्र प्रदेश आणि पश्चिमेला छत्तीसगड आणि पूर्वेला बंगालच्या उपसागराने वेढलेले आहे . हे त्याच प्राचीन राष्ट्राचे आधुनिक नाव आहे, कलिंग, ज्यावर मौर्य सम्राट अशोकाने इ.स.पूर्व २६१ मध्ये आक्रमण केले होते आणि युद्धातील भयंकर रक्तपातामुळे व्यथित होऊन शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला होता.

ओडिशा राज्याची स्थापना

आधुनिक ओडिशा राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 रोजी कटक येथील कनिका पॅलेस येथे झाली .राज्याची स्थापना राज्य म्हणून झाली आणि या नवीन राज्यातील बहुतेक नागरिक ओडिया भाषिक होते. राज्यात १ एप्रिल हा उत्कल दिवस (ओडिशा दिवस) म्हणून साजरा केला जातो.

ओडिशा राजाचा इतिहास

ओरिसाचा इतिहास पाहिल्यास आपल्याला असे दिसून येते की ओडिशा पूर्वी कलिंग आणि उत्कल या नावाने ओळखले जात असे. ओडिशा राज्याचे नाव अनेक वेळा बदलले गेले आहे, 2011 मध्ये या राज्याचे नाव ओरिसा वरून “ओरिसा” असे बदलण्यात आले. ओरिसा देखील मुघल सल्तनत आणि इंग्रजांच्या ताब्यात गेला आहे आणि हे राज्य 1508 मध्ये स्वातंत्र्याच्या साखळीत होते.

कदाचित तुम्हाला माहित नसेल की दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिटलरने ओडिशा काबीज करण्याची योजना आखली होती कारण हिटलरचा असा विश्वास होता की ओडिशामध्ये भरपूर नैसर्गिक पदार्थ आहेत ज्याच्या सहाय्याने तो कोणतेही युद्ध जिंकू शकतो, परंतु हिटलरचे हे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले.

तसेच ओडिशा मौर्य साम्राज्याच्या शासक अशोकाशी संबंधित आहे. इ.स.पूर्व २६१ मध्ये कलिंग युद्धादरम्यान झालेल्या नरसंहाराचे साक्षीदार झाल्यानंतर अशोकाने या ठिकाणी मन बदलून बौद्ध धर्म स्वीकारला. दुसऱ्या शतकात खारावेल आणि भौमकारा राजघराण्याने १०व्या शतकापर्यंत या ठिकाणी राज्य केले.

भूवर्णन

राज्याचे सामान्यत: चार नैसर्गिक विभाग पडतात. (अ) उत्तरेचे पठार : यात मयूरभंज, केओंझार व सुंदरगढ हे जिल्हे आणि धेनकानाल जिल्ह्याचा पाल्लहरा तालुका हा उंचसखल प्रदेश उत्तरेकडून दक्षिणेकडे उतरत येतो. हा बिहारच्या छोटा नागपूर पठाराचाच दक्षिण भाग असून त्याच्या टेकड्यांवर पडणारा पाऊस असंख्य प्रवाहांनी नद्यांना जाऊन मिळतो.

या पठाराचा सरासरी ९३० मी. उंचीचा मध्यभाग, वैतरणी व ब्राह्मणी नद्यांमधील सर्वांत महत्त्वाचा जलविभाजक आहे. त्याच्या उत्तर व पूर्व भागांत अनेक टेकड्यांच्या रांगा असून त्यांत मलयगिरी, मानकर्णाच, मेघसानी अशी १,१०० ते १,२०० मी. उंचीची शिखरे आहेत. (आ) मध्यवर्ती  नदीखोऱ्यांचा विभाग : हा उत्तरेचे पठार व पूर्वेच्या टेकड्या यांच्या दरम्यान येतो.

यात राज्यातल्या मुख्य नद्यांची जलवाहन क्षेत्रे असून त्यांत बोलानगीर, संबळपूर व धेनकानाल जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागात जमिनी सुपीक आहेत. सपाट मैदानांतून मधूनमधून उभ्या टेकड्या आढळतात. राज्याच्या वायव्य भागातले महानदीतले खोरे बरेच विस्तृत आहे.

मध्य विभागातली महानदी, ब्राह्मणी व वैतरणी या नद्यांची खोरी समांतर, कृषिसंपन्न व दाट वस्तीची आहेत. (इ) पूर्वेकडच्या टेकड्यांचा भाग :  हा भाग म्हणजे भारतीय पूर्वघाटाच्या शेवटच्या रांगा आहेत. मध्यभागातील नदीखोऱ्यांच्या दक्षिणेस व नैर्ऋत्येस सु. २५० किमी., ईशान्य नैर्ऋत्य रोखाने या पसरल्या असून त्या कोरापुट, कालाहंडी, बौध खोंडमाल्स व गंजाम जिल्ह्यांतून जातात.

त्यांच्यामधील प्रशस्त खुल्या पठारांभोवती वनप्रदेश व राज्यातली सर्वोच्च शिखरे– देवमाली १,६७० मी., तुरिआ कोंडा १,५९८ मी. व महेंद्रगिरी १,५०० मी. आहेत. या गिरिप्रदेशाची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून ९३० मी. असून तो बहुमोल वृक्षांच्या दाट रायांनी व्यापलेला आहे.

महानदी, ब्राह्मणी व वैतरणी या राज्यातल्या मुख्य नद्या वायव्येकडून आग्नेयीकडे जवळजवळ समांतर वहात जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. त्यांच्याखेरीज राज्यात उत्तर भागात सालंदी, बुराबलंग व सुवर्णरेखा आणि दक्षिण भागात ऋषिकूल्या, वंशधारा, नागावली, इंद्रावती, कोलाब आणि मचकुंद या लहान नद्या आहेत. मध्य प्रदेशातून येणारी महानदी ओरिसात ८५३ किमी. लांब वाहते. ती येथील सर्वांत मोठी नदी असून १,३२,६०० चौ. किमी.

क्षेत्रातले पाणी वाहून नेते आणि महापुराचे वेळी ४४,८०० घमी./से. किंवा जवळजवळ गंगेइतके पाणी बंगालच्या उपसागरात सोडते. अशा वेळी तिचे पात्र दीड किमी. पेक्षाही जास्त रुंदावते. ती अनेक मुखांनी सागराला मिळते. या व दुसऱ्या दोन नद्यांच्या मुखप्रवाहांचे एक जाळेच त्यांच्या त्रिभुजप्रदेशात बनले आहे.

ओरिसातले मोठे जलाशय म्हणजे हिराकूद धरणाने झालेला तलाव आणि भरतीच्या वेळी खाऱ्या व ओहोटीच्यावेळी गोड्या पाण्याचे किनाऱ्याच्या आतले चिल्का सरोवर हे होत. राज्याचा ४८२ किमी. लांबीचा समुद्रकिनारा रेताड व नद्यांच्या गाळाने उथळ बनलेला आहे.

हवामान

कर्कवृत्ताच्या दक्षिणेस एकच अंशावर उत्तरसीमा असणारे हे राज्य उष्ण कटिबंधात अतएव स्वाभाविकतः उष्ण वायुमानचे आहे. वातावरणाच्या कमी दाबाच्या पट्ट्यात येत असल्याने येथील पर्जन्यप्रमाण मध्यम आहे वेगवेगळ्या भागांच्या उंचसखलपणामुळे त्यांत थोडेबहुत फेरफार होतात.

उन्हाळ्यात पूर्वेकडील टेकड्या व उत्तरेकडचे पठार यांच्या उंचीवरची ठिकाणे वगळता सर्वत्र सामान्य तपमान ३८° से. असते व किनाऱ्याकडून अंतर्भागाकडे ते वाढत जाते. थंडीच्या दिवसात सरासरी तपमान २२·८० ते १५० से. पर्यंत उतरते. पावसाळ्यात सरासरी वार्षिक १४८ सेंमी. पाऊस पडतो.

अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन्हींवरचे मान्सून प्रवाह या राज्यात एकत्र येतात. नैर्ऋत्य मान्सूनचे काळात बंगालच्या उपसागरावरून किनाऱ्यावर पुष्कळदा तुफाने येतात. याच सुमारास ईशान्य मान्सूनचे काही झोत पूर्वेकडच्या टेकड्यांवर येतात. राज्यात झालेल्या १९७१च्या तुफानाने फार नुकसान झाले.

लोकसंख्या

2011 च्या जनगणनेनुसार ओडिशा राज्याची लोकसंख्या 41,974,218 एवढी असून त्यातील पुरुषांचे प्रमाण 21,20 9,812 असून महिलांचे प्रमाण 20,774,406 असे आहे. साक्षरता दर 87.60%आहे. त्यात पुरुषांचे प्रमाण 81.60 % तर महिलांचे प्रमाण 64 % आहे.

लोकसंख्येपैकी 8.27 प्रतिशत लोक शहरात राहणारे होते. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. रोजगारीसाठी आंध्र प्रदेश व इतर शेजारच्या राज्यांतून ओरिसात येणाऱ्या लोकांपेक्षा सु. एक लाख अधिक लोकांनी या राज्यातून मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल व आसाममध्ये स्थलांतर केल्याचे आढळून आले आहे.

ओरिसात वेळोवेळी वेगवेगळ्या वंशांचे लोक येऊन स्थायिक झाल्यामुळे राज्यातील प्रजा एकजिनसी नाही. लोकसंख्येत अनुसूचित जमातींचे प्रमाण १५·७ प्रतिशत आहे आणि आदिवासी २४ प्रतिशत आहेत. ९४ (१९६१) अनुसूचित जमातींपैकी पाण, गंदा, डोम, धोबा, बावरी व कांद्रा हे बहुसंख्य आहेत.

आदिवासींच्या ६२ जमातींपैकी कोंड, गोंड, संताळ, सावरा, मुंडा, कोल, भुइयाँ, ओराओं, भूमिजी, भौमिया व शबर यांची संख्या जास्त आहे. कोरापुट, मयूरभंज, सुंदरगढ व गंजाम जिल्ह्यांत यांची वस्ती जास्त आहे. आदिवासींचे धर्म प्राथमिक स्वरूपाचे जडप्राणवादी आहेत. ओरिसातले इतर लोक बव्हंशी वैष्णव किंवा शैव पंथी हिंदुधर्मीय आहेत.

पुरीचा जगन्नाथ हे राज्यातले प्रधान दैवत असून त्याच्या भक्तांखेरीज भुवनेश्वराचे शिवभक्त व अल्पप्रमाणात जैन मताचे लोक राज्यात आहेत. बहुसंख्य प्रजा कृषिव्यवसायी ग्रामीण असल्याने तिचे जीवन रूढीप्रमाणे व्यतीत होते. कारखाने व खाणींमुळे झालेल्या नव्या वस्तीच्या ठिकाणांतून मात्र लोकांची राहणी आधुनिक होऊ लागली आहे.

मृदा आणि जमीन

राज्याच्या उत्तरेच्या पठारभागाची माती लाल आहे. इकडे ग्रॅनाइट खडक जास्त असल्याने त्याची रेती मातीत असते. या भागात पाणी धरून ठेवणाऱ्या चिकणमातीचेही काही प्रमाण जमिनीत आहे.

मध्यपठारावरच्या मृदा विविध प्रकारांच्या आहेत. खडकापासून बनलेली माती, वाऱ्या-पावसाने वाहून आणलेली धूळ आणि गंजाम जिल्ह्याच्या ईशान्येतील व महानदीच्या दोन्ही काठांची कपाशीची काळी माती. आणखीही वेगवेगळ्या जातींच्या मृदा मध्यपठारावर सापडतात. किनाराभागात दुमट माती आहे. ओरिसाच्या मृदांची संपूर्ण पाहणी अजून झालेली नाही.

खनिजे

राज्यात लोहधातुकाचे प्रचंड साठे आहेत. ६० प्रतिशतपेक्षा अधिक लोहांश देणारे कच्चे खनिज विशेषत: सुंदरगढ, केओंझार व मयूरभंज जिल्ह्यांत सापडते. कटक जिल्ह्यातही नवे साठे मिळाले आहेत. भारतातले २० प्रतिशत मँगॅनीज केओंझार, सुंदरगढ, बोलानगीर व कालाहंडी जिल्ह्यांत निघते.

केओंझार, धेनकानाल व कटक जिल्ह्यांत क्रोमाइट उपलब्ध आहे. धेनकानालच्या तालचेर तालुक्यात भरपूर कोळसा मिळतो. गंजाम जिल्ह्याच्या गंगपूर भागात डोलोमाइट व चुनखडक काढण्यात येतात.

शेती

ओडिशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. ओडिशाची सुमारे 80 टक्के लोकसंख्या शेतीमध्ये गुंतलेली आहे, जरी येथील बहुतांश जमीन नापीक किंवा एकापेक्षा जास्त वार्षिक पिकांसाठी अयोग्य आहे.

ओडिशामध्ये सुमारे 40 लाख शेततळे आहेत, ज्यांचे सरासरी आकार 1.5 हेक्टर आहे, परंतु दरडोई कृषी क्षेत्र 0.2 हेक्टरपेक्षा कमी आहे. राज्यातील एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ४५ टक्के शेतजमीन आहे.

त्यातील 80 टक्के भाताचे पीक घेतले जाते. तेलबिया, कडधान्ये, ताग, ऊस आणि नारळ ही इतर महत्त्वाची पिके आहेत.आणि मान्सूनच्या पावसाच्या वेळेत आणि प्रमाणातील फरकामुळे, येथे उत्पादन कमी आहे.

वने व प्राणी

ओडिशा राज्यात शाल, साग, शिसवी, पिआसाल, कुरूम, चाफा व गंभर या जातींचे वृक्ष आहेत. इमारती व इतर बहुमोल लाकडांखेरीज बाकीचा लाकुडफाटा जळणाच्या कामी येतो. बांबूची बेटेही विस्तीर्ण क्षेत्रांवर आहेत. त्यांचा विनियोग कागद-गिरण्या करतात.

बिड्या वळण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या तेंदूच्या पानांचे उत्पादनही बऱ्याच प्रमाणात होते. ओरिसाच्या जंगलातून सर्पगंधासारख्या कित्येक औषधी वनस्पती आणि थोड्याफार प्रमाणात मध व लाख जमा करण्यात येते.

वन्यप्राण्यांपैकी या राज्यात वाघ, हत्ती व चित्ते विपुल आहेत. वायव्यभागात काही रानरेड्यांचे कळप आहेत. महानदी  व ब्राह्मणी नद्यांच्या मुखाशी सुसरी आढळतात. चिल्का सरोवरात पाणबदके व स्थलांतर करणाऱ्या काही पक्ष्यांच्या जाती आढळतात.

मयूरभंज जिल्ह्यात वन्यपशुसंरक्षणार्थ १,०४० चौ. किमी. क्षेत्राचे सिमिलीपाईगिरी अभयारण्य आहे. तशीच संरक्षित क्षेत्रे चंडका व खंडगिरी येथे करण्याची योजना आहे. कालाहंडी व कोरापुट जिल्ह्यांतील काही वनप्रदेश १९५८ साली सुरू झालेल्या दंडकारण्य निर्वासित-पुनर्वसन योजनेत गेला आहे.

ओडीसा राज्याचा पेहराव

पुरुषांचा वेश सामान्यत: धोतर, बनिअन व खांद्यावर चादर आणि स्त्रियांचा गुडघ्याइतकी साडी असा असतो. आदिवासींच्या वन्य राहणीत जमातीनुसार फरक असतात.

ओडिशा राज्याचे अन्न

ओडिसा मध्ये घेतले जाणारे मुख्य पीक तांदूळ आहे जे ओडिशाचे मुख्य अन्न आहे. ओरिसा हे प्रामुख्याने दुधापासून तयार केलेल्या गोड पदार्थांसाठी ओळखली जाते .रसगुल्ला, रस्मालाई ,चेनापोडा ,खीरामोहन, राजाभोग,रबडी, रसबली आणि पीठा हे काही ठराविक गोड पदार्थ आहेत.

भात, भाज्या, खिचडी, आलू पालक साग असे काही शाकाहारी पदार्थ आहेत. ओडिशाच्या ठराविक पदार्थांमध्ये ‘सागा’, ‘भाजी’, ‘भात’, ‘डाळ’, ‘बेसरा’ किंवा ‘महुरा’ (मसालेदार करी), मासे आणि चटणी किंवा ‘आंबट’ यांचा समावेश होतो.

ओडिशातील लोक नारळ, मनुका, सुका मेवा आणि मसाल्यांनी शिजवलेल्या चणा डाळीचा आस्वाद घेतात. ‘दलमा’, ‘पखल’, ‘मिठा भात’ आणि ‘पुलाओ’ हे तांदळाचे काही प्रतिष्ठित पदार्थ आहेत.

ओडिशातील लोकांमध्ये आणखी एक प्रसिद्ध अन्न म्हणजे ‘बेसारा’ जो मिश्र भाज्यांनी शिजवला जातो. ‘चेनकेडा’, ‘चिंगरी मलाई’, ‘दही बैंगण’, ‘दही माचा’, ‘घुगनी’ हे इतर स्वादिष्ट पदार्थ आहेत.

भाषा

ओडिया भाषा ही राज्याची अधिकृत आणि सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भाषिक सर्वेक्षणानुसार, ओडिशाच्या लोकसंख्येपैकी ९३.३३% लोक ओडिया भाषिक आहेत.

मूळ रहिवासी आर्य कुटुंबातील होते आणि तेथील भाषा बंगाली ,आसामी आणि मैथिली सारखी आहे .वर्षानुवर्षे ओडिया भाषेमध्ये बालेश्वरी, भात्री, लारिया,संबलपुरी ,गंजमी, छत्तीसगडी आणि मेदिनिपुरि यांसारख्या भाषेत इतर अनेक भिन्नता निर्माण झाल्या आहेत.

ही भारतातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक आहे आणि शेजारच्या राज्यांमध्ये देखील बोलली जाते इतर राज्यातून आलेल्या लोकांकडून येथे इतर भाषा बोलल्या जातात त्या म्हणजे इंग्रजी व हिंदी या भाषाही बोलल्या जातात.

उद्योगधंदे

राज्याला अनुकूल समुद्रकिनारा तसेच चिल्का सरोवर, हिराकूद जलाशय, इतर तळी व अनेक नद्या असूनही मच्छीमारीचा विकास पुरेसा नाही. समुद्रातून व चिल्का सरोवरातून मॅकेरल, सरंगा, हिलसा, वोय या जातीचे मासे काढण्यात येतात. मच्छीमारीच्या एकूण १४,३०० चौ. किमी. क्षेत्रातून सु. ४ कोटी रु. किंमतीचे मत्स्योत्पादन होते.

शासकीय क्षेत्रातील हिंदुस्थान स्टीलचा राउरकेला येथील प्रचंड पोलाद कारखाना वर्षाला १० लाख टन उत्पादन करीत आहे. त्याच्याभोवती व राज्यात अन्यत्र लोहसंबंधित व पूरक वस्तूंचे अनेक कारखाने, यंत्रमाग, लोखंडी नळ, ओतीव बीड, भट्टीच्या विटा, प्रशीतके, रसायने व खते तयार करू लागले आहेत. हिराकूदच्या विजेवर चालणारा ॲल्युमिनियमचा एक कारखाना वर्षाला १०,००० टन उत्पादन करीत आहे.

त्याखेरीज ओरिसात सिमेंट, चिनी मातीच्या वस्तू, कागद, कापड, काच, साखर इ. मालांचे कारखाने, उपलब्ध कच्चामाल, पाणी, जळण, वीज आणि मजूर या सोयींचा फायदा घेऊन चालू झाले आहेत. भारतातील निकेलचा  पहिला कारखाना कटक जिल्यातील सुकिंदा येथे सुरू होत आहे. देशाच्या मँगॅनीज उत्पादनातील २० टक्के भाग ओरिसाचा आहे.

शिवाय राज्यभर विविध लघुउद्योगांचे कारखाने आहेत. हस्तव्यवसाय व कुटीरोद्योग यांत मुख्यतः हातमाग कापड, बांबू व वेतकाम, विड्या, खेळणी, तांब्यापितळेच्या वस्तू, कलाकुसरीच्या उपयुक्त वस्तू व चांदीचे जाळीकाम अशा मालांचे उत्पादन होते.

कटक हे औद्योगिक केंद्र व मुख्य बाजारपेठ आहे. पुरी, बलसोर, संबळपूर, भुवनेश्वर, चौद्वार व पर्लाकिमिडी येथेही प्रादेशिक व्यापार चालतो. ओडिशातील संबल आणि इक्कत साड्या भारतात खूप प्रसिद्ध आहेत या साड्या हातमागा पासून बनवल्या जातात.

पर्यटन स्थळे

ओरिसा हे भारतातील एक सुंदर राज्य आहे जे आकर्षक समुद्र किनारे, निसर्गरम्य मंदिरे, सुंदर पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. जगन्नाथ पुरी मंदिर आणि कोणार्क सूर्य मंदिर ही ओडिशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.

याशिवाय ओरिसा हे भातशेती आणि रोमांचक ठिकाणे तसेच ऐतिहासिक वास्तूंसाठीही ओळखले जाते. हनुमान जी ची सर्वात मोठी मूर्ती ओडीशामध्ये आहे. जे पंपोषमध्ये आहे आणि हे ठिकाण हनुमान वाटिका म्हणून प्रसिद्ध आहे.

ओरिसा राज्याच्या नृत्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. ओडिशाची कला, संस्कृती, सण आणि संगीत या राज्याला स्वतःची ओळख देतात.

ओडिशाला समृद्ध कलात्मक वारसा आहे आणि त्यांनी भारतीय कला आणि वास्तुकलेची उत्कृष्ट उदाहरणे निर्माण केली आहेत. भित्तिचित्रे, दगड आणि लाकडावरील कोरीवकाम, देव चित्रे (पट्टा पेंटिंग म्हणून ओळखले जाते) आणि ताडाच्या पानांवरील चित्रांद्वारे आजही कलात्मक परंपरा जपल्या जातात. हस्तकला कलाकार त्यांच्या अलंकृत कारागिरीसाठी अत्यंत सुरेख जाळी कापून चांदीच्या रंगात प्रसिद्ध आहेत.

नृत्य

आदिवासी भागात लोकनृत्यांचे अनेक प्रकार आहेत . खेड्यापाड्यात वाद्य आणि बासरीचे संगीत प्रचलित आहे. ओडिसी , ओडिशाचे शास्त्रीय नृत्य, 700 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे. मूलतः ते देवासाठी मंदिर नृत्य होते. नृत्य प्रकार, हालचाली, मुद्रा आणि हावभाव मोठ्या मंदिरांच्या भिंतींवर, विशेषत: कोणार्क येथे सादर केले गेले.

हस्तकला आणि नक्षीकामाच्या स्वरूपात कोरलेल्या या नृत्याच्या आधुनिक प्रवर्तकांनी ते राज्याबाहेरही लोकप्रिय केले आहे. मयूरभंज आणि सरायकेला प्रदेशातील छाऊ नृत्य (मुखवटा घातलेल्या कलाकारांनी सादर केलेले नृत्य) हा ओडिशाच्या संस्कृतीचा आणखी एक वारसा आहे.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment