सिंधू नदीची संपूर्ण माहिती Sindhu River Information In Marathi

Sindhu River Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण दक्षिण आशियातील एक प्रमुख नदी!!  तिबेट ,भारत व पाकिस्तानातून वाहणारी प्रमुख नदी म्हणजे सिंधू नदी!!! या नदीची सखोल माहिती पाहणार आहोत. हिमालयातील बर्फाच्छादित शिखरे उगम पावणाऱ्या नद्या पैकी सिंधू नदी आहे.

Sindhu River Information In Marathi

सिंधू नदीची संपूर्ण माहिती Sindhu River Information In Marathi

सिंधू हे एक प्राचीन भारतीय राज्य होते ज्याचे वर्णन महाभारत आणि हरिवंश पुराणात केले आहे. हे सिंधू (सिंधू) नदीच्या काठावर प्राचीन भारतापासून ते आधुनिक पाकिस्तानपर्यंत पसरलेले आहे… “सिंधू” चा शब्दशः अर्थ “नदी” आणि “समुद्र” असा होतो.

या नदीला प्राचीन भारतीयांनी सिंधू आणि पर्शियन लोक हिंदू म्हणतात आणि दोघांनीही तिला “सीमा नदी” मानले. अस्को पारपोलाच्या मते, दोन नावांमधील फरक 850 ते 600 बीसीई दरम्यान झालेल्या जुन्या इराणी ध्वनी बदलामुळे आहे.

सिंधू जलमार्ग, ज्याला संस्कृतमध्ये सिंधू असेही म्हणतात, ही भारतीय उपखंडातील इंडो-गंगेच्या मैदानातील सर्वात महत्त्वाची नद्यांपैकी एक आहे. वायव्य भारतातून पाकिस्तानपर्यंत जाणार्‍या सिंधू जलमार्गाला सिंधू या संस्कृत शब्दावरून नाव देण्यात आले आहे.

या नदीला प्राचीन संस्कृत लेखनात ‘सिंधू’ या नावाने ओळखले जाते. ‘बिग बॉडी ऑफ वॉटर’ या शब्दाचा अर्थ ‘समुद्र किंवा पाण्याचे विशाल भाग’ असा होतो. इराणचे नागरिक त्याला हेंडू म्हणून संबोधू लागले. हे नाव इराणी लोकांकडून ग्रीक लोकांपर्यंत पोहोचले, ज्यांनी त्यात बदल करून ‘इंडोस’ केले आणि रोमन लोक त्याला ‘इंडस’ म्हणू लागले.

काही भाषाशास्त्रज्ञांच्या मते, सिंधू नदीचा संदर्भ “समुद्र किंवा पाण्याचा मोठा भाग” ऐवजी “सीमा किंवा किनारा” आहे. सिंधू नदी प्राचीन काळी इराणी आणि भारतीय यांच्यात सीमा होती.प्राचीन भारतातील या नदीचे महत्त्व यावरून कळू शकते की ‘सिंधू’ हे नाव ऋग्वेदिक भाषेत 176 वेळा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आढळते.

पंजाब आणि सिंधच्या मैदानासाठी सिंधू नदी हा पाण्याचा सर्वात महत्वाचा स्त्रोत आहे आणि ती पाकिस्तानच्या शेती आणि अन्न उत्पादनाचा कणा आहे. ही नदी विशेषतः महत्वाची आहे कारण खालच्या सिंधू खोऱ्यात पाऊस कमी पडतो.

तिबेटमध्ये उगम झाल्यानंतर भारतातील लडाख पर्यंत आणि नंतर पाकिस्तानात मधून ही नदी वाहत जाते . ब्रह्मपुत्रा नदी प्रमाणे ही नदी देखील तीन देशात वाहते. इंग्रजी भाषेत या नदीला “इंडस” असे म्हणतात. सिंधू संस्कृतीचा उगम याच नदीच्या किनाऱ्यावर झाला आहे.

हिंदू धर्मातील वेद सिंधू नदीच्या किनारी रचले गेले आहेत .हिंदू व हिंदुस्तान हे शब्द याच नदीवरुन पडले आहेत .पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे नाव सिंधू नदी वरूनच पडले आहेत. सिंधू खोरे संस्कृती जगाच्या प्राचीन नद्यांच्या खोर्‍यातील संस्कृती पैकी एक प्रमुख संस्कृती आहे.

सिंधू नदीची लांबी

भारतीय उपखंडातील सर्वात महत्त्वाच्या ड्रेनेज सिस्टिम पैकी एक म्हणजे सिंधू नदी. सिंधू ची लांबी 2,880 किलोमीटर असून भारतात 709 किलोमीटर आहे. सिंधूचे सुमारे 1,165,000 चौरस किलोमीटरचे क्षेत्र आहे. त्यापैकी 321,248 चौरस किलोमीटर पाण्याखाली आहे.

या नदीचा उगम तिबेटमध्ये समुद्रसपाटीपासून 5,182 मीटर उंचीवर कैलास रांगेत मानस सरोवरात होतो .वायव्य दिशेकडे आपला प्रवास सुरू करते. तिबेटमधील सुरुवातीच्या प्रवाहमार्गा नंतर ती भारतात प्रवेश करते. येथे तिची वाहण्याची दिशा आग्नेय वायव्य असून सुमारे 709 किलोमीटर अंतरावर ती पाकिस्तानात प्रवेश करते.

येथे दक्षिणेस वळते व तिची हीच दिशा अरबी समुद्राला मिळेपर्यंत कायम राहते. आपल्या मुखाशी तिने त्रिभुज प्रदेश तयार केला असून सभोवतालच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गाळाचे संचयन केले आहे. हिला डाव्या तीरावर झास्कर, अस्तुर, पंचनंद व उजव्या तीरावर शयोक, गिलगिट, काबुल या उपनद्या येऊन मिळतात.

येथील तिचे खोरे रुक्ष व निर्जन आहे.काश्मीरमध्ये उत्तरेकडील लडाख पर्वतश्रेणी व दक्षिणेकडील झास्कर पर्वतश्रेणी यांदरम्यानच्या खोल घळईतून वायव्येस वाहताना लेहजवळतिला झास्कर पर्वतश्रेणी पार करुन आलेली झास्कर ही उपनदी मिळते.पुढे स्कार्डूजवळ श्योक ही उपनदी येऊन मिळते.

बाल्टिस्तानमध्येखैटाशो गावाजवळ झास्कर पर्वतश्रेणी पार करुन सिंधू अतिशय खोलघळईतून वाहत रहाते. येथील घळई ही जगातील सर्वांत खोल घळ्यांपैकी एक आहे. काराकोरम पर्वतश्रेणीच्या पायथ्याजवळ तिला गिलगिट नदीमिळाल्यानंतर एक मोठे वळण घेऊन सिंधू नैऋर्त्यवाहिनी बनते.

पुढेनंगा पर्वताच्या पश्चिमेस हिमाद्री श्रेणीतील खोल अशा घळईतून ती वाहूलागते. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते सिंधू नदीचे पात्र जुने असून हिमालयउंचावला जात असताना नदीचे खणनकार्य प्रभावी राहिल्याने सिंधू नदीने आपले पात्र कायम ठेवले आहे. सिंधू नदीमुळे हिंदुकुश ही हिमालयाचीशाखा हिमालयापासून अलग झाली आहे.

जम्मू व काश्मीर राज्यातूनपुढे सिंधू पाकिस्तानात प्रवेश करते.पाकिस्तानच्या उत्तर भागातील पर्वतीय प्रदेशातून काहीशी दक्षिणेसवाहत जाते. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांतून सु. १,६६५ किमी.चाप्रवास करुन अटकजवळ पर्वतीय प्रदेशातून बाहेर पडून ती पंजाबच्यापठारी प्रदेशात येते. तिचा उगमाजवळचा भूप्रदेश सस.पासून ५,५०० मी.उंचीचा असून अटकजवळच्या भूभागाची उंची ३०५ ते ४५७ मी. आहे.अटकजवळच तिला काबूल व स्वात नद्या येऊन मिळतात.

त्यामुळे तिचे पात्र बरेच रुंद म्हणजे सु. २४४ मी. रुंदीचे बनते. येथे तिच्यातीलपाण्याची पातळीही बरीच वाढत असून प्रवाहही खूप वेगवान असतो.अटक ते कालाबागपर्यंतचा प्रवाह उच्चभूमी व खडकाळ प्रदेशातूनवाहत असल्यामुळे द्रुतगती आहे. या मार्गावरील चुनखडीच्या टेकाडांमुळेतिचा प्रवाह निळसर दिसतो, म्हणून तिला नील-आब हे नाव मिळालेआहे.पुढे सॉल्ट रेंज डोंगररांग पार करुन पाकिस्तानातील अर्धओसाडपंजाब मैदानात ती प्रवेश करते.

डेरा इस्माइलखानजवळ तीदक्षिणवाहिनीहोते. मिठाणकोटजवळ तिला पंचनद म्हणजे भारतातून वाहत जाणाऱ्याझेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज यांचा संयुक्त प्रवाह मिळतो.त्यामुळे तिचे पात्र सु. २·५ किमी.पर्यंत रुंद बनले असून प्रवाह मंदगतीने वाहू लागतो. मिठाणकोटपासून पुढचा प्रवाह खोल, रुंद व संथ आहे.त्याला मिहरान म्हणतात.

मिठाणकोटनंतर सिंधू पुन्हा नैर्ऋत्येस वळूनसिंध प्रांतात शिरते आणि कराचीच्या आग्नेयीस अनेक फाट्यांनी अरबीसमुद्राला मिळते. त्यामुळे मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. यात्रिभुज प्रदेशाची सुरुवात थत्ता (तत्ता) पासून होते. हा त्रिभुज प्रदेश विस्तृत असून त्यातील बराचसा भाग दलदलयुक्त आहे.

श्योक, झास्कर, शिगर, गिलगिट, अस्तोर ह्या उपनद्या तसेच इतरअनेक प्रवाह मुख्य हिमालय श्रेणी, काराकोरम पर्वतश्रेणी, नंगा गिरिपिंडव कोहिस्तान उच्चभूमीवरील हिम व हिमाचे वितळलेले पाणी सिंधूनदीकडे वाहून आणतात.

उत्तर पाकिस्तानातील काबूल, स्वात व कुर्रमया सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. टोची, गुमल, झोब, विहोआ,संगर व रावनी या कमी लांबीच्या नद्या सुलेमान श्रेणीतून पूर्वेस वहातजाऊन सिंधूला मिळतात.

भारतातून वहात येणाऱ्या झेलम, चिनाब,रावी, बिआस व सतलज या सिंधूच्या सर्वांत मोठ्या उपनद्या आहेत.या पाच नद्यांचा संयुक्त प्रवाह मिळाल्यानंतरचे सिंधूचे पात्र रुंद व उथळबनले असून ती मंदगतीने वाहते.

त्यामुळे तिच्या प्रवाहमार्गात मोठ्याप्रमाणावर गाळाचे संचयन होते. पुरापासून संरक्षण करण्यासाठी तिच्याकाठावर बांध घातले आहेत; परंतु कधीकधी उत्प्रवाहाच्या वेळीपात्राबाहेर पाणी पसरुन मोठे नुकसान होते.

सिंधू नदीचे पाणलोट क्षेत्र ११,६५,५०० चौ. किमी. असून त्यांपैकीभारतातील क्षेत्र २७·५६ टक्के आहे. भारतातील सिंधूच्या एकूणपाणलोट क्षेत्रापैकी ६० टक्के जम्मू व काश्मीर राज्यात, १६ टक्के हिमाचलप्रदेशात, १६ टक्के पंजाबात, ५ टक्के राजस्थानमध्ये तर ३ टक्के हरयाणातआहे. तिचे वार्षिक प्रवाहमान नाईल नदीच्या प्रवाहमानापेक्षा जवळजवळदुप्पट आहे.

कारण सिंधूला काराकोरम, हिंदुकुश, मुख्य हिमालयपर्वतश्रेणी यांवरील हिमक्षेत्र व हिमनद्यांपासून तसेच हिमालयीन उप-नद्यांपासून पाणीपुरवठा होतो. पावसाळ्यात पावसामुळे व उन्हाळ्यातहिमालय पर्वतक्षेत्रांवरील बर्फ वितळून पाणीपुरवठा होत असल्यामुळेसिंधू बारमाही वाहणारी नदी आहे.

तरीही ऋतुमानानुसार तिच्या पाण्याच्यापातळीत चढउतार आढळतात. हिवाळ्यात किमान प्रवाहमान असते. वसंतऋतु व उन्हाळ्यात हिमनग वितळल्यामुळे प्रवाहमान वाढते, तर जुलै तेसप्टेंबर या पावसाळ्यातील कालावधीत नदीला पूर येतात. काही वेळा हेपूर विनाशकारी ठरतात.

इ. स. १८४१ मध्ये अटक येथे आलेल्यापुराच्या वेळी पाण्याची पातळी चार तासांत २५ मीटरने वाढून हजारोचौ. किमी. क्षेत्र पूरगस्त झाले होते. मैदानी प्रदेशातील उष्ण व कोरड्याहवामानामुळे पृष्ठीय जलाचा पुरवठा कमी होतो. तसेच तेथील बाष्पीभवनाचा जास्त वेग व जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण अधिक असल्यानेपाण्याची पातळी कमी असते.

सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहें-जो-दडो, हडप्पा, चन्हुदारो इ. ठिकाणीकेलेल्या उत्खननात एका अत्यंत प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले.ही प्राचीन संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृती होय. या संस्कृतीचा उगम वविकास याच नदीखोऱ्यात झाला.

सिंधू नदीचे खोरे हे पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्येचीघनता असणारे खोरे आहे. सिंधू नदीच्या तीरावरील व तीराजवळीलपाकिस्तानमधील प्रमुख नगरे पुढीलप्रमाणे आहेत :

कराची, कोत्री,ठठ्ठा, केंटा, हैदराबाद, सेहवान, सक्कर, रोहरी, मिठानकोट, डेरा गाझीखान,डेरा इस्माइलखान, मिआनवाली, कालाबाग, खुशालगढ व अटक.जम्मू व काश्मीर राज्यातीलसिंधूच्या खोऱ्यात गिलगिट, स्कार्डू, लेह हीप्रमुख नगरे आहेत.

जगातील जलसिंचनासाठी सर्वाधिक उपयोग केल्या जाणाऱ्यानद्यांपैकी ही एक नदी आहे. पाकिस्तानात हिचा उपयोग प्रामुख्यानेजलसिंचन व जलविद्युत्‌शक्ती निर्मितीसाठी केला जातो. प्राचीन काळापासूनसिंधूचा जलसिंचनासाठी वापर केला जात आहे.

ब्रिटिश शासनानेसन १८५० नंतर कार्यान्वित केलेली कालवा जलसिंचन पद्घती हीजगातील सर्वांत मोठ्या आधुनिक कालवा सिंचन प्रकल्पांपैकी एकमानली जाते. सक्कर व कोत्री ही प्रमुख धरणे आहेत. सक्कर येथील लॉइडधरण १९३२ मध्ये बांधून पूर्ण झाले असून ते विशेष महत्त्वाचे आहे.

टार्बेला धरण हे जलसाठयाच्या दृष्टीने जगातील सर्वांत मोठ्या धरणांपैकीएक आहे. कालाबाग येथे सिंधू चुनखडीयुक्त घळईतून वाहते. येथीलभक्कम तळभागामुळे येथे थळ हा जलसिंचन प्रकल्प उभारण्यात आलाआहे.

पाकिस्तानातील ओसाड व निमओसाड प्रदेशाला पाणीपुरवठा करणारा सिंधू हाच प्रमुख स्रोत असून, त्यामुळेच येथील कृषी विकासघडून आला आहे. ईजिप्तमध्ये जसे नाईलला महत्त्व तसे पाकिस्तानातसिंधूला महत्त्व प्राप्त झाले आहे.

सिंधू खोरे हे प्रमुख कृषी क्षेत्र असून गहू,मका, तांदूळ,बारीक तृणधान्य, कापूस, खजूर व फळे ही या खोऱ्यातीलप्रमुख पिके आहेत.सिंधू नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. खाद्योपयोगी मत्स्यप्रकारांस पल्ला असे म्हणतात. थत्ता, कोट्री व सक्कर हीपाकिस्तानातील प्रमुख मासेमारी केंद्रे आहेत.

हिंदुस्थानच्या फाळणीमुळे सिंधू खोऱ्यातील सर्वाधिक पाण्याचा लाभपाकिस्तानला झाला. सिंधूचे मुख्य खोरे पाकिस्तानात गेले, तर तिच्याप्रमुख उपनद्यांचे शीर्षप्रवाह भारतात राहिले. सिंधू व तिच्या उपनद्यांच्या पाणीवाटपावरुन भारत-पाकिस्तान दरम्यान अनेकदा वाद निर्माण झाले. त्यादृष्टीने १९६० मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान सिंधू पाणी वाटपासंदर्भातीलकरार करण्यात आला आहे.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment