मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. 15 जुलै 2025 पासून मदत व पुनर्वसन विभागामार्फत शेतपिकांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी दिली जाणारी भरपाई फक्त फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
नवीन अटी काय आहेत?
- पंचनामे करताना आणि नुकसानभरपाईसाठी अर्ज करताना फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) अनिवार्य असेल.
- पंचनामेच्या अर्जामध्ये आता फार्मर आयडीसाठी स्वतंत्र जागा ठेवण्यात आली आहे.
- DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीतून निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाईल.
- फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ मिळणार नाही.
फार्मर आयडी म्हणजे काय?
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत केंद्र सरकारची AgriStack योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक डिजिटल ओळख देण्यात येते. याच ओळखपत्राला फार्मर आयडी म्हणतात. यामुळे शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल व एकाच आयडीने विविध सरकारी योजनांसाठी अर्ज करणे शक्य होईल.
शेतकऱ्यांना काय फायदे होणार?
- पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत थेट खात्यावर व जलद मिळणार.
- अपात्र लाभार्थ्यांची छाननी होऊन चुकीच्या लाभांवर आळा बसेल.
- अर्जाची प्रक्रिया सुलभ होईल व सरकारी कामकाजात गती येईल.
महत्त्वाची सूचना — शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले फार्मर आयडी तयार करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात नुकसान भरपाईसह इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.