मित्रांनो २८ मे २०२५ रोजी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) धारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. ही योजना मुख्यत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
या योजनेंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवणे आणि कृषी उत्पादकतेत वाढ करणे हा आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार संबंधित राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा. फक्त निर्धारित मर्यादेपर्यंतचेच कर्ज माफ होईल. मात्र, सरकारी नोकरीत असलेल्या किंवा राजकीय पदावर असलेल्या नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनेसाठी स्वतःची शेतजमीन असलेले शेतकरी, बटाईदार शेतकरी, एकल किंवा भागीदारी तत्त्वावर शेती करणारे, लहान व सीमांत शेतकरी आणि दीर्घकाळ शेती करणारे अनुभवी शेतकरी पात्र मानले जातील.
या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक ओझ्यातून मुक्तता मिळेल. त्यामुळे ते नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती अधिक प्रभावीपणे करू शकतील. यामुळे उत्पादनवाढ होईल आणि कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. शिवाय कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या मानसिक तणावातून शेतकऱ्यांची सुटका होईल.
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आणि योजनेची माहिती मिळवावी. यादीत नाव असल्यास कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. यासाठी आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे.
सरकारने ही योजना पारदर्शकपणे राबवण्यासाठी स्थानिक प्रशासन व बँकांना समन्वय साधून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत स्रोतांमधूनच माहिती मिळवावी.
शेतकरी कर्जमाफी योजना २०२५ ही शेतकऱ्यांसाठी एक आश्वासक पाऊल आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून शेतीचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल.