होळी वर मराठी निबंध | Holi Essay in Marathi

    Holi Essay in Marathi : या सणाला होळी किंवा रंगांचा उत्सव असे देखील म्हटले जाते. होळी हा भारतामधील एक प्रसिद्ध आणि सर्वांचा आवडता सण आहे, जो खूप आनंदात आणि धूम धाममध्ये साजरा केला जातो. हा सण भारताप्रमाणे इतर देशांतही साजरा केला जातो थोडक्यात संपूर्ण जगात साजरा केला जातो. आणि भारत हा सर्व संस्कृतींनी, धर्म, जातींनी नटलेला देश आहे त्यामुळे ह्यात अनेक सण मिळून-मिसळून साजरे केले जातात.

    तुम्हाला माहिती आहे का होळी हा सण का साजरा केला जातो ? Holi Essay in Marathi या मागेही एक मोठी प्राचीन कथा दडलेली आहे, त्या बद्दल आपण जाणून घेऊयात.

होळी वर मराठी निबंध | Holi Essay in Marathi

    Holi Essay in Marathi : एकेकाळी राक्षस कुळातील हिरण्यकश्यप नावाचा राजा राहत होता. त्याला प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता, ज्याला आता भक्त “प्रल्हाद” नावाने ओळखतो. तो विष्णूचा मोठा भक्त, परंतु हे त्याच्या पित्याला म्हणजेच हिरण्यकश्यपला मान्यच नव्हते. कारण हिरण्यकश्यप प्रचंड अहंकारी आणि क्रूर होता. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ आणि देवताहूनही सर्वश्रेष्ठ मानायचा. त्याला देवांबद्दल सन्मान नव्हता आणि तो देवांना मानत नसे. आपला मुलगा दिवसरात्र विष्णुच्या भक्तीमध्ये लीन असतो, फक्त विष्णूचा जप, नामस्मरण करत असतो हे त्याला कधीही मान्य नव्हते. त्यामुळे हिरण्यकश्यप प्रल्हादला त्यापासून दूर करण्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्याला मारण्याचे उपायही करत होता, परंतु भक्त प्रल्हाद हे विष्णु देवतांचे मोठे भक्त असल्यामुळे हिरण्यकश्यप प्रत्येक वेळी अपयशी ठरत असे.

    एकदा हिरण्यकश्यपने प्रल्हादला मारण्यासाठी आपल्या बहिण “होलिका” हिची मदत घेतली. होलिका देखील राक्षस कुळातील होती आणि तिलाही एक वरदान होते की ‘तिला आगीपासून काहीच हानी होणार नाही आणि तिचे आगीत भस्म होणार नाही’. आणि मग हिरण्यकश्यपने एक चीता तयार केली ज्यात आपल्या होलिका बहिणीला बसवले व तिच्या मांडीवर आपल्या मुलाला भक्त प्रल्हादला बसवले व चीतेले आग लावली. प्रल्हाद विष्णु देवाचा भक्त असल्यामुळे त्याला त्या आगीत काहीच हानी पोहोचली नाही पण त्या आगीत स्वतः होलिकाच भस्म होऊन राख झाली. त्यानंतर विष्णूंनी नृसिंह च्या रुपात खांब्यातून बाहेर निघून राक्षस हिरण्यकश्यपाचा वध केला.

    या कथेतून आपल्याला एवढेच शिकायला मिळते की वाईट गोष्टीचा नेहमी नाश होतो. त्यामुळे आपल्या जीवनातील, समाजातील वाईट गोष्टीचा व  नकारात्मक गोष्टींचा नाश व्हावा म्हणून होळी हा सण साजरा केला जातो.
होळी रंगांचा सन हिवाळ्यानंतर वसंत ऋतू मध्ये येतो. होळी सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच साधारणतः मार्च महिन्यात साजरा केला जातो. साधारणतः होळी हा सण दोन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी होळी दहन केले जाते तर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते.

    होळीच्या दिवशी रात्री होळी दहन केले जाते. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो आणि “घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा, वाईट गोष्टीचा नाश होऊ दे!” अशी प्रार्थना केली जाते. होळीची पुजा ही सहसा स्त्रिया करतात. नैवेद्य दिल्यानंतर होळीच्या अवती-भवती फेऱ्या मारतात. तांब्यामधून खाली पाण्याची धार लाऊन होळीच्या बाजूने पाणी सोडले जाते. होळीच्या पाच दहा दिवस आधीच आम्ही गल्लीतील मित्र तयारीला लागतो. सर्वजण होळीसाठी लाकडे गोळा करतात ज्यात आमची खूप मज्जा येते. काही लाकडे आम्ही इकडून-तिकडून गोळा करतो आणि बाकीचे वर्गणीच्या पैशांतून विकत आणतो. होळीच्या दिवशी संध्याकाळी आम्ही त्या सर्व लाकडांची होळी उभी करतो आणि गल्लीतील सर्वांची तयारी झाली की होळी दहन करतो.

    होळीच्या दुसऱ्या दिवशी असते रंगपंचमी. या दिवशी एकमेकांना रंग लाऊन खेळले जाते. लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वजण आनंदाने रंगपंचमी खेळतात. रंगपंचमीच्या दिवशी सर्वजण सकाळमध्ये उठून रंगपंचमी खेळतात. “आपल्याला पाण्याने रंगपंचमी खेळायची असेल तर थोडेसेच पाणी खर्च करा किंवा जे पाणी पिण्यायोग्य नसेल ते वापरावे” असे आम्हाला मोठ्याकडून सांगितले जाते. असा हा सण भारताप्रमाणे इतर देशांतही प्रसिद्ध आहे. मुख्यता: हा सण लहान मुलांना जास्तच आवडतो कारण ह्या दिवशी सर्वजण आनंदाने एकमेकांशी हसत खेळत असतात जे खूपच उत्तम आहे. मला आणि माझ्या मित्रांना देखील हा सण खूपच प्रिय आहे, ह्या दिवशी आम्ही संपूर्ण दिवस खूप मज्जा-मस्ती करतो.

    होळी सण सर्व लोकांना जवळ आणून आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे. विद्यार्थी असले म्हणजे Essay on Holi Festival in Marathi Language, Holi Essay in Marathi हा प्रश्न नेहमी पडतो. नकारात्मक गोष्टींचा नाश कण्यासाठी हा सण साजरा केला जातो आणि पुढच्या दिवशी रंगपंचमी जी सर्व लोकांना एकत्र आणण्याचे काम करते असा हा दोन दिवसांचा सण होळी या नावाने ओळखला जातो.

Leave a Comment