बाळ गंगाधर टिळक यांची संपूर्ण माहिती Bal Gangadhar Tilak Information In Marathi

Bal Gangadhar Tilak Information In Marathi बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक संस्थापक मानले जातात. भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये सर्वात पहिले नेते म्हणून गंगाधर जी यांचा उल्लेख होतो. बाळ गंगाधर टिळक हे अनेक प्रतिभावंत असे नेते होते. ते एक शिक्षक वकील व राष्ट्रीय नेते सुद्धा होते तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि मुक्ती योद्धा होते. इतिहास संस्कृत खगोलशास्त्र व इतिहास हे त्यांच्या अनेक प्रतिभा होत्या.

Bal Gangadhar Tilak Information In Marathi

बाळ गंगाधर टिळक यांची संपूर्ण माहिती Bal Gangadhar Tilak Information In Marathi

बाळ गंगाधर टिळक हे प्रेमाने लोकमान्य म्हणून ओळखले जायचे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच अशी घोषणा सर्वप्रथम बाळ गंगाधर टिळक यांनी केली होती. या बोधवाक्यातूनच अनेकांना प्रेरणा मिळाली तसेच बाळ गंगाधर जी टिळक यांनी महात्मा गांधींना पूर्ण समर्थन दिले नाही. त्यांचा असा विश्वास होता की, अहिंसा सत्याग्रह पूर्णपणे सोडून देणे योग्य नाही आणि हिंसीचा वापर अगदी आवश्यक असेल तेव्हा केला पाहिजे.

नावबाळ गंगाधर टिळक
जन्म23 जुलै 1856
जन्म ठिकाण रत्नागिरी
वडीलरामचंद्र टिळक
आईपार्वताबाई
चळवळभारतीय स्वतंत्र लढा
संघटनाअखिल भारतीय काँग्रेस
पत्नीसत्यभामा
मृत्यू1ऑगस्ट 1920

टिळक यांचा जन्म व बालपण :

बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी एका हिंदू चित्पावन ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता. आता हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. त्यांचे वडिलोपार्जित गाव चिखली होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते. त्यांचे वडील टिळक शाळेमध्ये शिक्षक होते आणि च्या आईचे नाव पार्वताबाई होते.

टिळक हे 16 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. 1871 मध्ये वडिलांच्या मृत्यू काही महिने आधीच त्यांचा विवाह तापीभाई यांच्याशी झाला होता. लग्नानंतर त्यांचे नाव बदलून त्यांनी सत्यभामाबाई असे ठेवले होते. ज्यावेळी टिळकांचे लग्न झाले त्यावेळी त्यांचे वय केवळ सोळा वर्षाचे होते.

शिक्षण :

टिळक यांनी 1877 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित विषयांमध्ये प्रथम श्रेणीत कला या शाखेची पदवी मिळवली तसेच एलएलबी कोर्समध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांनी एम ए चा कोर्स अर्धवट सोडून दिला आणि 1879 मध्ये त्यांनी सरकारी लॉ कॉलेजमधून एलएलबी ही पदवी प्राप्त केली.

पदवी मिळवल्यानंतर त्यांनी पुण्यातील एका खाजगी शाळेत गणित शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे शाळेतील सहकाऱ्यांशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे त्यांनी माघार घेतली आणि ते पत्रकार बनले. टिळकांनी सार्वजनिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला.

ते नेहमीच म्हणायचे धर्म आणि व्यवहारिक जीवन वेगळे नाही. केवळ स्वतःसाठी काम न करता देशाला आपले कुटुंब बनविणे हाच खरा आत्मा आहे. पुढची पायरी म्हणजे मानवतेची सेवा करणे आणि त्याही पुढची पायरी म्हणजे देवाची सेवा करणे आहे.

टिळक यांचे सामाजिक कार्य :

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे एकाच सरकारी शाळेमध्ये शिक्षक असताना निबंध मालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून एक शाळा काढण्याची ठरवले होते. तेव्हा टिळक व आगरकर हे दोघेही त्यांना जाऊन भेटले आणि 1 जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलचे त्यांनी स्थापना केली.

टिळकांनी विना वेतन शिक्षककी पेशा स्वीकारला. विष्णुशास्त्री 1882 मध्ये मरण पावले त्यानंतर 1884 मध्ये वेडरबर्न, वर्डस्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो .केळकर, भंडारकर यांच्या मदतीने टिळक आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे 1885 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना सुद्धा करण्यात आली. टिळक गणित व संस्कृत हे विषय शिकवत होते.

सार्वजनिक उत्सवाची सुरुवात :

बाळ गंगाधर टिळक यांनी 1893 साली राजकीय जनजागृतीसाठी गणेश उत्सव सुरू केला आणि महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शिवजयंतीला सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी केले गेले. शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणाद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे एक उद्दिष्ट होते.

केसरी आणि मराठा चे प्रकाशन :

लोकमान्य टिळकांनी 1881 साली भारतीय लढाया व संकटाची लोकांना जाणीव करून देण्यासाठी स्वराज्याचे वृत्ती रुजवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्याची मानसिकता निर्माण करण्यासाठी केसरा व मराठा हे दोन्ही साप्ताहिके काढली दोन्ही वृत्तपत्रे लोकांमध्ये खूप गाजली व प्रसिद्ध सुद्धा झाली.

वैयक्तिक जीवन :

1902-1903 या वर्षांमध्ये पुण्यातले थैमान माजले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलत भाऊ आणि भाचा प्लेग या रोगाला बळी पडला तसेच त्याच आठवड्यात लोकमान्य यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथ सुद्धा प्लेगला बळी पडला. पत्नीचा देहांत सुद्धा त्याच वर्षी झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्नीच्या नंतर त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी त्यांनी सांभाळले त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळक बंधू म्हणून ओळखली जातात.

टिळक यांचा राजकीय प्रवास :

बाळ गंगाधर टिळक हे 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी स्वशासनावरील पक्षाच्या उदारमतवादी समजूतींकडे निश्चित करणे सुरुवात केली. यादरम्यान बाळ गंगाधर टिळक म्हणाले की, ब्रिटिश सरकारच्या विरोधात मूलभूत घटनात्मक चळवळ करणे निष्कळ आहे.

त्यानंतर पक्षाने त्यांना त्यावेळी काँग्रेसचे प्रमुख नेते गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विरोधात उभे केले. लोकमान्य टिळक यांना स्वराज्य मिळवण्यासाठी आणि इंग्रजांना उसकावून लावण्यासाठी एक शक्तिशाली उठाव पाहिजे होता. त्याचवेळी त्यांनी स्वदेशी चळवळची समर्थन केले व बंगालच्या फाळणीच्या वेळी ब्रिटिश उत्पादनांवर बहिष्कार टाकला होता.

गंगाधर टिळक यांची तुरुंग भेट :

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारच्या वाईट धोरणांना कडाडून विरोध केला असताना त्यांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून इंग्रजांविरुद्ध प्रक्षोभक लेख लिहिले. त्यानंतर त्यांनी या लेखातून चाफेकर बंधूंना सुद्धा प्रेरणा दिली. त्यामुळे त्यांनी 22 जून रोजी कमिशनर लेफ्टनंट आयर्स्ट त्यांना लिहिले.

1897 मध्ये खून झाला त्यानंतर या हत्तेसाठी लोकमान्य टिळकांवर देशद्रोहाचा खटला चालवला गेला. त्यांना सहा वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. 1908 ते 1914 च्या दरम्यान त्यांना बर्मा मधील मंडळी तुरुंगात पाठवण्यात आले. ते तुरुंगात असताना त्यांनी लेखन सुरू ठेवले तरी त्यांनी तुरुंगात गीता रहस्य हे पुस्तक लिहिले.

बाळ गंगाधर टिळक यांचे निधन :

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शोकांतिकेचा बाळ गंगाधर टिळक यांच्यावर खूपच खोलवर परिणाम झालेला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि नंतर त्यांना मधुमेहाचा त्रास झाला. त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होऊन गेली. यानंतर टिळकांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले.

FAQ

लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव काय?

बाळ गंगाधर रामचंद्र टिळक.

बाळ गंगाधर टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली होती?

रवींद्रनाथ टागोर.

गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला?

23 जुलै 1856 रोजी.

लोकमान्य टिळकांनी स्वराज्य बद्दल कोणती?

गर्जना केली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.

लोकमान्य टिळक यांचा मृत्यू कधी झाला?

1 ऑगस्ट 1920 रोजी.

Leave a Comment