बाबू गेनू यांची संपूर्ण माहिती Babu Gainu Information In Marathi

By Wiki Mitra

Published On:

Follow Us

Babu Gainu Information In Marathi बाबू गेनू हे एक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी झालेले स्वतंत्र सैनिक होते. भारत देश ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये असताना त्यांनी आपल्या देशावर अनेक वर्ष राज्य सुद्धा केले. लोकांचा खूप छळ केला परंतु हे सर्व रोखण्यासाठी भारतातून ब्रिटिशांना बाहेर काढण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर स्वतंत्र लढ्यात सहभागी झाले व आपल्या देशाला स्वातंत्र्य वेळेपर्यंत त्यांनी आपल्या प्राणाची आहुती सुद्धा दिली. त्यामधीलच एक क्रांतिकारक म्हणजे बाबू गेनू हे होते.

Babu Gainu Information In Marathi

बाबू गेनू यांची संपूर्ण माहिती Babu Gainu Information In Marathi

ब्रिटिश मालावरील बहिष्कारच्या चळवळीमध्ये महाराष्ट्रातल्या मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून देणाऱ्या ट्रकला रोखण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. 12 डिसेंबर 1930 ला अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्ययात्रेस वीस हजाराचा जमा झाला होता. सोलापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

नावबाबू गेनू
जन्म. 1 जानेवारी 1908
जन्म ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ
वडीलज्ञानोबा आपटे
मृत्यू 12 डिसेंबर 1930

बाबू गेनू यांचा जन्म व बालपण :

बाबू गेनू यांचा जन्म हा 1 जानेवारी 1908 रोजी महाराष्ट्र राज्यातील आंबेगाव या तालुक्यांमध्ये असलेल्या महाळुंगे पडवळ येथे झाला. हे एक छोटीशी गाव होते त्यांचे कुटुंब शेतकरी होते म्हणजेच त्यांचा जन्म सुद्धा शेतकरी कुटुंबामध्ये झाला होता. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. ते दहा वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यावेळी मुंबई या शहरांमध्ये सूतगिरणांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत होता आणि ते सुद्धा मुंबईमधील एका सूतगिरणी मध्ये काम करण्यासाठी गेले.

ज्यावेळी ते सुरत गिरणीमध्ये काम करत होते. त्यावेळी ब्रिटिशांचे सरकार देशात अस्तित्वात होती आणि त्यावेळी ब्रिटिश सरकार हे परदेशी बनावटींच्या कपड्यांची आयात करत होते. परंतु ती विदेशी बनावटीच्या कपड्यांच्या आयातिच्याविरुद्ध असल्यामुळे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य सैनिक यांची एक योजना तयार केली आणि त्यामध्ये सुद्धा ते समाविष्ट झाले.
जेव्हा त्यांनी त्यांच्या प्राणाची आवडती दिली त्यावेळी केवळ त्यांचे वय 22 वर्षे एवढे होते.

बाबू गेनू यांचे शिक्षण :

बाबू गेनू यांचे शिक्षण केवळ चौथीपर्यंत झाले होते. त्यांच्या आई-वडिलांचे हे प्रिय पुत्र होते. त्यांच्या शिक्षकांचे नाव गोपीनाथ पंत होते. हे त्यांना रामायण, महाभारत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कथा सांगत असत जेव्हा बाबू गेनू दहा वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील वारले आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सर्व भार त्यांच्या आईवर पडला. त्यांच्या आईच्या कामात सुद्धा बाबू गेनू यांनी त्यांना मदत केली.

आईला त्यांचे लवकर लग्न करायचे होते. परंतु त्यांनी भारत मातेची सेवा करायची म्हणून लग्नाला नकार दिला होता आणि ते मुंबईला गेले. तेथे तानाजी पाठक यांच्या संघात ते सामील झाले. वडाळ्याच्या मिठा गरावर छापा टाकणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये ते सामील झाले होते. त्यांना पकडून सहश्रम कारावासाची शिक्षा सुद्धा झाली.

एरोडा तुरुंगातून सुटल्यावर ते आपल्या आईला भेटायला गेले. त्यांना लोकांकडून आपल्या शूर मुलाची स्तुती एकूण खूप आनंद झाला होता. आईची परवानगी घेऊन ते पुन्हा मुंबईला गेले आणि त्या टीममध्ये सामील झाले.

बाबू गेनू यांचा स्वातंत्र्यलढा :

1930 मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला तेव्हा भारतामध्ये इंग्रज खूपच अत्याचार करत होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधीजींचे विशेष महत्त्व होते. भारतातील लोक सर्वच गटातील या सत्याग्रहांमध्ये सामील झाले होते. त्यामध्ये वृद्ध सुशिक्षित अशिक्षित ग्रामीण नागरिक सर्वांनाच सहभागी करून घेतले. त्यांनी दारूच्या दुकानासमोर ठेवून ठिय्या मांडून विदेशी कपड्यांच्या होळी केल्या तसेच घरी मीठ बनवून मिठाचा कायदा सुद्धा मोडला.

सरकारने जनतेवर प्रचंड अत्याचार केले. अनेकांना त्यांनी कैद केले, ताठी चार्ज केला काहींना बंधू सुद्धा टाकण्यात आल्या अशाप्रकारे अनेक अत्याचार परकीय राजवटी कडून झाले. त्यामुळे जनतेमध्ये संताप निर्माण झाला. ज्ञानोबा आपटे यांचा मुलगा बाबू गेनू हे पुणे जिल्ह्यातील महाळुंगे या गावातील केवळ 22 वर्षाचे तरुण होते. सत्याग्रही मध्ये हे सुद्धा सामील झाले होते.

मँचेस्टर जॉर्ज फ्रेझीयर हा एक कापडाचा मोठा व्यापारी होता आणि 12 डिसेंबर 1930 रोजी किल्ल्यामधील जुन्या हनुमान गल्लीतील दुकानातून परदेशी बनावटीचे कापड हे मुंबई बंदराजवळ नेत होते आणि त्याला त्याच्या विनंतीनुसार पोलीस संरक्षण सुद्धा मिळालेले होते; परंतु त्यांना परदेशी बनावटी महाल भारतामध्ये येऊ द्यायचा नव्हता. म्हणून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी ट्रक हलवून देण्याची विनंती केली परंतु असे झाले नाही आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांनी त्या आंदोलकांना बाजूला सरकवले व ट्रक हलवला.

ज्यावेळी कालदेवी रोडवर ट्रक आला त्यावेळी बाबू गेनू कालदेवी रोडवर ट्रकच्या आडवे उभे राहिले आणि महात्मा गांधीजींचा जय जयकार करू लागले होते. या प्रकारच्या अहिंसक आंदोलनामध्ये पोलीस बाबू गेनू आणि इतर आंदोलकांना शारीरिक दृष्ट्या रोखत असताना बाबू गेनू यांनी आपला स्वातंत्र्य संकल्प सोडला नाही आणि त्यांनी ट्रकसमोरून स्वतःला हलवून सुद्धा दिले नाही. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी बाबू गेनू यांच्या अंगावरून ट्रक चालवण्याचे आदेश दिले.

ज्यावेळी हा ट्रक चालक बालवीर सिंग होता. जो भारतीय होता. त्याने बाबू गेनू यांच्या अंगावरून ट्रक चालवण्यास नकार दिला. त्यावेळी इंग्रज पोलीस अधिकारी ट्रक ड्रायव्हर सीटवर बसून बाबू गेनू यांच्या अंगावर ट्रक घातला आणि त्यावेळी त्यांचा तेथेच मृत्यू झाला आणि तो दिवस म्हणजे 12 डिसेंबर 1930 हा होता.

अशा प्रकारे बाबू गेनू यांनी आपल्या प्राण्याची आहुती देशासाठी दिली. बाबू गेनू यांच्या मृत्यूनंतर स्वातंत्र्यसैनिकांनी आणि संप संताप निषेध केले आणि त्याचवेळी ब्रिटिश प्रशासनाने ही घटना अपघात म्हणून एक प्रेस नोट सुद्धा जाहीर केले होते.

मृत्यू :

12 डिसेंबर 1930 या दिवशी बाबू गेनू यांनी आपल्या प्राण्याची आहुती देशासाठी दिली.

FAQ

बाबू गेनू यांचा जन्म कधी झाला?

1 जानेवारी 1908.

बाबू गेनू यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

ज्ञानोबा आपटे.

बाबू गेनू यांचा जन्म कोठे झाला?

बाबू गेनू यांचा जन्म महाळुंगे पडवळ या गावी झाला.

बाबू गेनू हे कोण होते?

बाबू गेनू हे एक स्वातंत्र्य सैनिक होते.

बाबू गेनू यांचा मृत्यू कधी झाला

बाबू गेनू यांचा मृत्यू 12 डिसेंबर 1930 रोजी झाला?

Wiki Mitra

Leave a Comment